शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

अखर्चित निधीवर अध्यक्षांनी विभागप्रमुखांना खडसावले

By admin | Updated: February 27, 2016 01:17 IST

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना लाखो रूपयांचा निधी मिळूनही खर्चाअभावी निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे.

अध्यक्षांनी घेतला आढावा : राज्य शासनाकडे तक्रार करण्याचा दिला दमचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना लाखो रूपयांचा निधी मिळूनही खर्चाअभावी निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक सभांमध्ये विरोधकांनी अखर्चित निधीवर सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांनी बुधवारी सभा बोलावून आढावा घेतला. यात अनेक विभागाचा निधी अखर्चित आढळून आल्याने विभाग प्रमुखांना चांगलेच खडसावले व अखर्चित निधी आर्थिक वर्ष संपण्याच्या अगोदर खर्च करा, अन्यथा राज्य शासनाकडे तक्रार करू, असा दम अध्यक्षांनी विभाग प्रमुखांना दिल्याची माहिती आहे. आर्थिक वर्ष संपण्याला केवळ एक महिना उरला आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक विभागांना मिळालेला निधी अखर्चित आहे. जिल्हा परिषद अंतर्गत कल्याणकारी योजना राबवून नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासन निधी देत असते. मात्र सत्ताधाऱ्यांमधील योग्य समन्वयाअभावी निधी अखर्चित असल्याचा मुद्दा विरोधकांनी अनेक सभांमध्ये लावून धरला. मात्र सत्ताधारी निधी खर्च झाल्याचेच सांगत राहिले. अखेर जिल्हा परिषद अध्यक्षांनी बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांची सभा बोलाविली. ही सभा रात्री उशीरापर्यंत चालली. यात अध्यक्षांनी शासनाकडून मिळालेल्या निधीचा आढावा घेतला. तेव्हा अनेक विभागांचा निधी अखर्चित असल्याची बाब समोर आली. विशेष करून कृषी विभाग व समाजकल्याण विभागाचा सर्वाधिक निधी अखर्चित असल्याची बाब समोर आल्याने या विभागाच्या अधिकाऱ्यांना अध्यक्षांनी चांगलेच खडसावल्याची माहिती आहे. पाणी टंचाई निवारणार्थ आलेल्या निधीतून सव्वा कोटी अखर्चित असून, अनुसुचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती विकास योजनेच्या कामासाठी ८ कोटी ७५ लाखांचा निधी मिळाला. परंतु, आतापर्यंत केवळ २ कोटी रूपये लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले असून जवळपास ५ कोटी रूपये अखर्चित आहेत. कृषी विभागाच्या विशेष घटक योजनेंतर्गत ५ कोटी ३३ लाखांचा निधी प्राप्त झाला. या योजनेच्या लाभासाठी ३ कोटींचे प्रस्ताव आले. आलेल्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली नसली तरी यातील जवळपास २ कोटींचा निधी अखर्चित आहे. असाच प्रकार सर्व विभागांमध्ये असून जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा जवळपास २० कोटी रूपयांचा निधी अखर्चित असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)