शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

जिल्ह्यात एमपीएससी उत्तीर्णचा टक्का वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:16 IST

एमपीएससी परीक्षा कठीण असते. त्यासाठी महागडे शिकवणी वर्ग लावावे लागतात. त्यानंतरच परीक्षा उत्तीर्ण होता येते, असा ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलांना समज आहे. परिणामी अनेकजण या परीक्षेकडे कानाडोळा करतात.

ठळक मुद्देजिद्दीने गाठले मिशन सेवेचे यश : पोलीस उपनिरीक्षकपदासाठी जिल्ह्यातील सहाजण उत्तीर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एमपीएससी परीक्षा कठीण असते. त्यासाठी महागडे शिकवणी वर्ग लावावे लागतात. त्यानंतरच परीक्षा उत्तीर्ण होता येते, असा ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलांना समज आहे. परिणामी अनेकजण या परीक्षेकडे कानाडोळा करतात. मात्र मागील तीन वर्षांचा आढावा घेतल्यास जिल्ह्यात एमपीएससी उत्तीर्णचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. ही बाब स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांना प्रेरणादायी ठरणारी आहे.सर्वात कठीण परीक्षा म्हणून एमपीएससी व युपीएससी परीक्षेकडे बघितले जाते. त्यातच ग्रामीण भागात सुविधांचा अभाव, पोषण वातावरण, मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे एमपीएससी उत्तीर्णचे प्रमाण बोटावर मोजण्याइतके आहे. मात्र जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यासाच्या भरोशावर अनेकांनी यशाचे शिखर पार करुन ग्रामीण विद्यार्थी कुठेच मागे नाही, हे सिद्ध करुन दाखविले आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या पोलीस उपनिरिक्षक पदी कोरपना तालुक्यातील श्यामसुंदर माधवराव सूर्यवंशी हा राज्यातून सहाव्या क्रमांकावर तर विदर्भातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्यासोबतच राजुरा तालुक्यातील ओम राजा कलेगुरवार, नागभीड तालुक्यातील निखील अरविंद राहाटे, शुभांगी शंकर सेलोकर, रुपेश कुंभारे, कुमुदिनी पाथोडे यांनी पोलीस उपनिरिक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तर राम चौधरीची कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली आहे.यापूर्वी नागभीड येथील राहुल फटिंग, राहुल गावंडे यांचीसुद्धा एमपीएसी परीक्षा उत्तीर्ण केली होती. तर सन २०१७-२०१८ मध्ये लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या परीक्षेमध्ये कोरपना येथील निलेश मालेकर, धीरज कोटरंगे, गोंडपिपरी तालुक्यातील राळेपेठ येथील पुरुषोत्तम पिंपळशेंडे यांची४१ वी रॅक पटकावित एसटीआयपदी निवड झाली. तर अनुप भोयर विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली. मूल येथील युगंधरा महाजनवार हिने मागील वर्षी घेतलेल्या उत्पादन शुल्क निरिक्षक पदाच्या परीक्षेत एनटीबी महिला प्रवर्गातून प्रथम तसेच कर सहाय्यक परीक्षेतसुद्धा एनटीबी प्रवर्गातून प्रथम आली होती.येथील निलीम दुधे यांनेसुद्धा कर सहाय्यक परीक्षेत अनुसुचित जातीतून १७ वे स्थान पटकाविले होते. तर वरोरा तालुक्यातील आव वडगाव येथील विनोद भोयर यांनेसुद्धा करसहाय्यक म्हणून निवड झाली होती.ग्रामीण भागातील अनेक युवकांनी जिद्दीने एमपीएसएसी परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.शासनाने मार्गदर्शन केंद्र सुरू करावेशहरामध्ये स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करणारे विविध शिकवणी वर्ग आहेत. मात्र ग्रामीण भागात अशी कोणतीही सुविधा नसल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया युवकांमध्ये परीक्षेबाबत विविध संभ्रम आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांसाठी शासनाने मार्गदर्शन केंद्र सुरु करावे, तसेच सामाजिक संघटनानी पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याºया युवकांकडून होत आहे.प्रेरणा घेण्याची गरजचंद्रपूर जिल्ह्यातून अनेक सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी स्वत: जिद्दीने अभ्यास करुन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. याच्यापासून प्रेरणा घेत मनातील स्पर्धा परीक्षेसंदर्भात असलेले गैरसमज दूर करुन स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.