शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

सिंचनाअभावी धान पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:15 AM

मूल तालुक्यातील गांगलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतजमिनीतील पिके सिंचनाअभावी नष्ट झाली असल्याने या सर्व शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. शासनाने मूल तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्यामुळे व या शेतकऱ्यांना नापिकीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण होण्याची शक्यता नसल्याने गांगलवाडी येथील आलेवाही, ........

ठळक मुद्देसर्वेक्षणाची मागणी : आलेवाही, नवेगाव शिवारातील पिके प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मूल तालुक्यातील गांगलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतजमिनीतील पिके सिंचनाअभावी नष्ट झाली असल्याने या सर्व शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. शासनाने मूल तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्यामुळे व या शेतकऱ्यांना नापिकीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण होण्याची शक्यता नसल्याने गांगलवाडी येथील आलेवाही, नवेगाव तसेच गांगलवाडी साजामधील शेतकऱ्यांची अडवणूक होणार असल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे.मूल तालुक्यातील आलेवाही, नवेगाव तसेच गांगलवाडी शिवारामधील शेकडो हेक्टर शेतजमिनी पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील गोलाभुज या तलावाच्या पाण्यावर निर्भर आहेत. यंदा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित भुमिकेमुळे या जमिनीतील धान पिकाला सिंचनाची व्यवस्था न झाल्याने पिके हातची गेली आहेत. त्यामुळे हजारो रूपये खर्ची घालूनही हजार रूपयाचेही उत्पन्न या शेतीतून होत नसल्यामुळे शेतकरी बांधव विवंचनेत आहेत. त्यामुळे आलेवाही, नवेगाव व गांगलवाडी या शिवारातील नुकसानीचे सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांनी केली आहे.याच शिवारातील काही शेतकऱ्यांनी हजारो रूपये खर्च करून खासगी बोर तसेच इंजिनद्वारा उपलब्ध असलेल्या पाण्याद्वारे आपली पिके वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे हे प्रयत्न यशस्वी न झाल्याने हा खर्चही व्यर्थ गेला आहे.पाणी वितरण समितीचे दुर्लक्षयंदा शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी पाणी वितरण समितीचे गठन करण्यात आले होते. परंतु ही समिती शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करून देण्यात अपयशी ठरल्याने अशा समितीच्या भरवश्यावर सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी न राहता स्वत: उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांच्या शेतीला वेळीच सिंचनाची सुविधा निर्माण होईल, या दृष्टीने अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत आपले कर्तव्य पार पाडावे, अशी मागणीही गांगलवाडी तसेच आलेवाही, नवेगाव शिवारातील शेतकरी बांधवांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती