शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६८ हजारांवर चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST

चंद्रपूर : सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे दिसत असले तर चाचण्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. चाचण्या सुरूच आहेत. जिल्ह्यात ...

चंद्रपूर : सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे दिसत असले तर चाचण्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. चाचण्या सुरूच आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६८ हजार ५५६ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी एक लाख ४४ हजार १३१ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार १३५ वर पोहोचली आहे. यातील तब्बल २१ हजार १९२ कोविड रुग्णांनी यशस्वीपणे कोविडवर मात केली असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या ५८४ बाधितांवर उपचार सुरू आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाची गती मंदावली आहे. दररोज कोरोनातून बरे होणाºयांची संख्या बाधित होणाºया रुग्णांच्या संख्येपेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन संपुष्टात आले होते. दिवाळीच्या दिवसात रस्त्यांवर, बाजारपेठात तुंबड गर्दी दिसून येत होती. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोना संसर्ग वाढून कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल, असे वाटले होते. मात्र तसे झाले नाही. उलट कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात चाचण्याही पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. आतापर्यंत एक लाख ६८ हजार ५५६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आलीे आहे. यातील एक लाख ४४ हजार १३१ नमुने निगेटिव्ह निघाले आहेत.

बॉक्स

६४ नव्या बाधितांची भर

जिल्ह्यात शनिवारी ८४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ६४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधितांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी मृत झालेल्यांमध्ये सोमनाथपूर ता. राजुरा येथील ७२ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३५९ बाधितांचा मृत्यू झाला असून यात चंद्रपूर जिल्ह्यातील ३३२ जणांचा समावेश आहे. उर्वरित तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १६, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

बॉक्स

येथील आहेत नवे बाधित

शनिवारी नव्या ६४ बाधितांचा भर पडली आहे. यात चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ३४, चंद्रपूर तालुका तीन, बल्लारपूर एक, भद्रावती एक, ब्रम्हपुरी एक, सिंदेवाही पाच, मूल दोन, गोंडपिपरी एक, राजुरा एक, चिमूर एक व वरोरा नऊ, कोरपना चार व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे.

बॉक्स

नागरिकांनो संकट अजून गेलेले नाही

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे दिसताच नागरिक पुन्हा स्वैर झाल्यासारखे दिसून येत आहेत. बाजारपेठेत, दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे दिसते. याशिवाय अनेक जणांनी तोंडावर मास्क घालणेही सोडून दिल्याचे दिसत आहे. कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे गेलेले नाही. कोरोना नियमांचे पालन न केल्यास कोरोना संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.