शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

बल्लारपुरात संक्रांतीच्या वाणामध्ये दिल्या ओबीसी जनगणनेच्या पाट्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 11:44 AM

देशात २०२१ मध्ये जनगणना होणार आहे.

चंद्रपूर : देशात २०२१ मध्ये जनगणना होणार आहे. मात्र त्यामध्ये ओबीसींसाठी नमुद करायला काॅलम नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेड, नॅशनल ओबीसी फेडरेशन, जिजाऊ ब्रिगेड, ओबीसी महासंघ सारख्या अनेक संघटना ओबीसी जनगणनेबाबत आग्रही आहेत. अंजलीताई साळवे यांचा न्यायालयीन लढा, मिशन संसद, मिशन विधिमंडळ ठराव तसेच त्यांच्या "लढा ओबीसी जनगणना 2021 पाटी लावा" मोहीमेतील पाट्या लावा मोहीम महाराष्ट्रातील विदर्भासह इतरही भागात  जोरात सुरू आहे.

सध्या संक्रांतीसाठी सर्वत्र महिला विविध प्रकारचे वाण देण्याची प्रथा असतांना बल्लारपुरात वाणामध्ये "जनगणना 2021 मध्ये ओ बी सी (व्हीजे, एनटी,डीएनटी, एस बी सी)चा कॉलम नाही म्हणून आमचा जणगणनेत सहभाग नाही " अश्या आशयाच्या पाट्या वाण म्हणून देऊन सरकारने ओबोसीची जनगणना करावी असा संदेश सरकारला पोहचवून डॉ ऍड अंजली साळवे यांच्या लढ्यात सहभाग दर्शविला. 

माधुरी खुटेमाटे यांच्या पुढाकारातुन जिजाऊ ब्रिगेडच्या अॉड. प्रिती पावडे, अर्चना फरकाडे, लता भेंडारकर, मंजुषा सरोदे, सारिका पायताडे, निकीता खाडे, पौर्णिमा वैद्य या महिलांनी वाणामध्ये या ओबीसी जनगणनेच्या पाट्या वाणामध्ये दिल्या. 

जिल्ह्यात मराठा सेवा संघाचे दिनेश पारखी यांची जनजागृती जोरात सुरू असताना अंजली साळवे यांच्या पाट्या मोठ्या प्रमाणात घरांवर लाऊन दिसत आहे. बल्लारपुरात विवेक खुटेमाटे, चंद्रशेखर भेंडारकर यांच्यासारखे अनेक व्यक्ती या कार्यात लागुन आहे. महिलांनी आता वाणामध्ये ओबीसी जनगणनेच्या पाट्या द्यायला सुरूवात केल्यामुळे येत्या काळात ओबीसी जनगणनेचा मुद्दा महत्वाचा ठरणार हे मात्र नक्की.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीMaharashtraमहाराष्ट्र