शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

आता कॉन्टेक्ट ट्रेसींगवर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:16 IST

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोना रूग्‍णांची वाढती संख्‍या तसेच वाढते मृत्‍यू लक्षात घेता प्रशासनाने या आपत्‍तीचा दक्षपणे सामना करायचा असेल ...

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोना रूग्‍णांची वाढती संख्‍या तसेच वाढते मृत्‍यू लक्षात घेता प्रशासनाने या आपत्‍तीचा दक्षपणे सामना करायचा असेल तर जिल्‍हाधिकारी, मेडीकल कॉलेजचे अधिष्‍ठाता, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक आणि जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी या चार अधिकाऱ्यांमध्‍ये असलेल्‍या समन्‍वयाचा अभाव तातडीने दूर व्‍हावा, जिल्ह्यातील चाचण्‍यांची संख्‍या वाढवावी, निर्णयांच्‍या अंमलबजावणीची गती वाढवावी, अशा सुचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केल्‍या. दरम्यान, या सुचनांच्‍या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करावी व जिल्ह्यातील टेस्‍टींगची संख्‍या वाढवत कॉन्‍टेक्‍ट ट्रेसींगवर भर द्यावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्‍या आटोक्‍यात आणण्‍याच्‍या दृष्‍टीने आरोग्‍य यंत्रणेचा आढावा घेण्‍यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्‍या विनंतीनुसार सार्वजनिक आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांनी ऑनलाईन बैठक घेतली. बैठकीला आ. सुधीर मुनगंटीवार, आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, जि. प. अध्‍यक्षा संध्‍या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने, अधिष्‍ठाता डॉ. हूमणे, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक डॉ. राठोड, जिल्‍हा आरोग्‍य अधीक्षक डॉ. गहलोत, मनपा आयुक्‍त राजेश मोहीते आदींची उपस्थिती होती.

चंद्रपूर जिल्‍हयात कोरानाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ऑस्‍कीजन बेड्स जास्‍तीत जास्‍त संख्‍येने निर्माण करावे, खासगी डॉक्‍टरांच्‍या सेवा घ्‍याव्या, रूग्‍णांना पोस्‍टीक जेवण द्यावे, आरोग्‍य सेवेचा दर्जा सुधारावा, कॉन्‍टेक्‍ट ट्रेसींग वाढवावे असे विविध निर्देश आरोग्‍यमंत्र्यांनी जिल्‍हाधिका-यांना दिले. लसीकरणात चंद्रपूर जिल्‍हा अव्‍वल ठरावा अशी अपेक्षा ना. राजेश टोपे यांनी व्‍यक्‍त केली.

बॉक्स

कोरोना चाचण्या वाढवाव्या-सुधीर मुनगंटीवार

बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वाढती रूग्‍णसंख्‍या लक्षात घेता कोरोना चाचण्या आणखी वाढविण्‍याची मागणी केली. वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ, नर्सेस यांची रिक्‍त पदे त्वरीत भरावी, अशा सूचना केल्या. कोरोना काळातील देयके प्रलंबित आहेत. अशी परिस्‍थीती राहिली तर प्रशासनाला कोण मदत करेल, असा सवालही त्‍यांनी केला. बेड मॉनिटरींग सिस्‍टीम उत्‍तम करावी, कॉल सेंटर निर्माण करावे, कंत्राटी कामगारांच्या आठ महिन्‍यांपासून थकित वेतनाकडेही त्यांनी लक्ष वेधले.