शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
5
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
6
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
7
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
8
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
9
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
10
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
11
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
12
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
13
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
14
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
15
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
16
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
17
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
18
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
19
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
20
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
Daily Top 2Weekly Top 5

दृष्काळग्रस्त यादीत चंद्रपूरचे नाव नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट; पिकांचे अतोनात नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 19:36 IST

Chandrapur : गेल्या तीन चार दिवसांपासून कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने हलक्या धानाची माती केली आहे. शेकडो शेतकऱ्यांचे धान पीक बांधात पडल्याने मातीमोल झाले आहे. प्रशासनाने योग्य सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मान्सून विभागाने दिलेल्या अंदाजानुसार चंद्रपुरात मागील तीन दिवस संततधार पाऊस कोसळला. शनिवारी दुपारी १२.३० वाजता सुरू झालेल्या पावसाने तर सायंकाळी ६.३० वाजताच उसंत दिली. चंद्रपुरातील मित्रनगर परिसरातील नागरिकांच्या घरात तर चक्क तीन ते चार फूट पाणी घुसले. विनायक अपार्टमेंटमागील एका घरावर झाड कोसळले. शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

त्यामुळे शेतपिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. अशाही स्थितीत जिल्ह्याचे नाव दृष्काळग्रस्त यादीत नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार जून ते सप्टेंबरचा सरासरी पाऊस १,०७२ मिमी असतो. मात्र, यंदा सप्टेंबर महिना संपण्यापूर्वीच १,२५५.३ मिमी प्रत्यक्ष पाऊस कोसळला. म्हणजे साधारण प्रमाणापेक्षा १७ टक्के पाऊस अधिक पडला आहे. मात्र, याचा फटका मोठ्या प्रमाणात शेतपिकांना बसला आहे. परिणामी, धान, सोयाबीन, कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतामध्ये तळेच निर्माण झाले आहे.

थोडक्यात बचावले चंद्रपुरातील कुटुंब

नागपूर रोडवरील जनता कॉलेज चौकाजवळच्या सिद्धिविनायक अपार्टमेंटचे चौकीदार दिनेश उईके यांच्या टिनाच्या घरावर एक मोठे झाड कोसळले. शेजारी राहणाऱ्या एका भगिनीने प्रसंगावधान राखून आवाज दिल्याने हे कुटुंब घराच्या बाहेर निघाले व थोडक्यात बचावले. नगरसेवक पप्पू देशमुख यांना माहिती मिळताच त्यांनी मनपाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून ते झाड काढले.

मित्रनगरात शिरले पाणी

शनिवारी दिवसभर झालेल्या पावसाने मित्रनगर परिसरातील घरात पाणी शिरले. अनेकांचे तर अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले.आठव्यांदा भोयगाव पुलावरील वाहतूक बंद

कोरपना : अधून-धून पडणाऱ्या

पावसामुळे वर्धा नदीवरील भोयगाव धानोरा मार्गावरील पूल शनिवारी मध्यरात्री पाण्याखाली आला. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे रात्रीपासून रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

हलक्या धानाची माती

नागभीड : गेल्या तीन चार दिवसांपासून कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने हलक्या धानाची माती केली आहे. शेकडो शेतकऱ्यांचे धान पीक बांधात पडल्याने मातीमोल झाले आहे. प्रशासनाने योग्य सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आहे. नागभीड तालुक्यात हलके (ठोकळ) आणि भारी (बारीक) या प्रकारच्या धानाचे उत्पादन घेतल्या जाते. बारीक थानापेक्षा ठोकळ थानास पाणी कमी लागते आणि लवकर निघते. तसेच रोगांचा प्रादुर्भावही नसतो. त्याचबरोबर शासनाच्या हमी भाव केंद्रांवर ठोकळ धानाची सहज विक्री होते. या कारणांमुळे गेल्या काही वर्षापासून या तालुक्यातील शेतकरी ठोकळ धानाची मोठ्या प्रमाणावर लागवड करू लागले आहेत. यावर्षीही तालुक्यातील २६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास १५ हजार हेक्टरवर या ठोकळ धानाची लागवड करण्यात आली असावी असा अंदाज आहे. आता हे धान पीक निसवून तयार आहे. हा पाऊस पडला नसता तर यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आठ दहा दिवसांत धानाची कापणी सुरू केली असती. मात्र नेमक्या याचवेळी वाऱ्यासह परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur Farmers Face Crisis: Crop Damage Amid Drought List Absence

Web Summary : Heavy rains in Chandrapur damaged crops, but the district isn't on the drought list, creating hardship for farmers. Excessive rainfall harmed paddy, soybean, and cotton. Homes flooded, and transportation was disrupted, adding to the woes.
टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीfarmingशेती