शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

दृष्काळग्रस्त यादीत चंद्रपूरचे नाव नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट; पिकांचे अतोनात नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 19:36 IST

Chandrapur : गेल्या तीन चार दिवसांपासून कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने हलक्या धानाची माती केली आहे. शेकडो शेतकऱ्यांचे धान पीक बांधात पडल्याने मातीमोल झाले आहे. प्रशासनाने योग्य सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मान्सून विभागाने दिलेल्या अंदाजानुसार चंद्रपुरात मागील तीन दिवस संततधार पाऊस कोसळला. शनिवारी दुपारी १२.३० वाजता सुरू झालेल्या पावसाने तर सायंकाळी ६.३० वाजताच उसंत दिली. चंद्रपुरातील मित्रनगर परिसरातील नागरिकांच्या घरात तर चक्क तीन ते चार फूट पाणी घुसले. विनायक अपार्टमेंटमागील एका घरावर झाड कोसळले. शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

त्यामुळे शेतपिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. अशाही स्थितीत जिल्ह्याचे नाव दृष्काळग्रस्त यादीत नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार जून ते सप्टेंबरचा सरासरी पाऊस १,०७२ मिमी असतो. मात्र, यंदा सप्टेंबर महिना संपण्यापूर्वीच १,२५५.३ मिमी प्रत्यक्ष पाऊस कोसळला. म्हणजे साधारण प्रमाणापेक्षा १७ टक्के पाऊस अधिक पडला आहे. मात्र, याचा फटका मोठ्या प्रमाणात शेतपिकांना बसला आहे. परिणामी, धान, सोयाबीन, कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतामध्ये तळेच निर्माण झाले आहे.

थोडक्यात बचावले चंद्रपुरातील कुटुंब

नागपूर रोडवरील जनता कॉलेज चौकाजवळच्या सिद्धिविनायक अपार्टमेंटचे चौकीदार दिनेश उईके यांच्या टिनाच्या घरावर एक मोठे झाड कोसळले. शेजारी राहणाऱ्या एका भगिनीने प्रसंगावधान राखून आवाज दिल्याने हे कुटुंब घराच्या बाहेर निघाले व थोडक्यात बचावले. नगरसेवक पप्पू देशमुख यांना माहिती मिळताच त्यांनी मनपाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून ते झाड काढले.

मित्रनगरात शिरले पाणी

शनिवारी दिवसभर झालेल्या पावसाने मित्रनगर परिसरातील घरात पाणी शिरले. अनेकांचे तर अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले.आठव्यांदा भोयगाव पुलावरील वाहतूक बंद

कोरपना : अधून-धून पडणाऱ्या

पावसामुळे वर्धा नदीवरील भोयगाव धानोरा मार्गावरील पूल शनिवारी मध्यरात्री पाण्याखाली आला. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे रात्रीपासून रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

हलक्या धानाची माती

नागभीड : गेल्या तीन चार दिवसांपासून कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने हलक्या धानाची माती केली आहे. शेकडो शेतकऱ्यांचे धान पीक बांधात पडल्याने मातीमोल झाले आहे. प्रशासनाने योग्य सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आहे. नागभीड तालुक्यात हलके (ठोकळ) आणि भारी (बारीक) या प्रकारच्या धानाचे उत्पादन घेतल्या जाते. बारीक थानापेक्षा ठोकळ थानास पाणी कमी लागते आणि लवकर निघते. तसेच रोगांचा प्रादुर्भावही नसतो. त्याचबरोबर शासनाच्या हमी भाव केंद्रांवर ठोकळ धानाची सहज विक्री होते. या कारणांमुळे गेल्या काही वर्षापासून या तालुक्यातील शेतकरी ठोकळ धानाची मोठ्या प्रमाणावर लागवड करू लागले आहेत. यावर्षीही तालुक्यातील २६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास १५ हजार हेक्टरवर या ठोकळ धानाची लागवड करण्यात आली असावी असा अंदाज आहे. आता हे धान पीक निसवून तयार आहे. हा पाऊस पडला नसता तर यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आठ दहा दिवसांत धानाची कापणी सुरू केली असती. मात्र नेमक्या याचवेळी वाऱ्यासह परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur Farmers Face Crisis: Crop Damage Amid Drought List Absence

Web Summary : Heavy rains in Chandrapur damaged crops, but the district isn't on the drought list, creating hardship for farmers. Excessive rainfall harmed paddy, soybean, and cotton. Homes flooded, and transportation was disrupted, adding to the woes.
टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीfarmingशेती