शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

केंद्र सरकारच्या दिव्यांग धोरणात हवी सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:19 IST

केंद्र सरकारने दिव्यांगांच्या हितासाठी नवीन धोरण तयार केले. परंतु, यामध्ये मूलभूत त्रुटी आहेत. मुख्य म्हणजे १८ वर्षांवरील अनाथ दिव्यांगाना मृत्यूपर्यंत बालगृहात ठेवण्याची तरतुदच नाही. संविधानात्मक सुरक्षाच नसल्याने जीवंत राहण्याची हमी नाही.

ठळक मुद्देविधूर पापळकर : १८ वर्षांवरील दिव्यांग होताहेत बेवारस

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारने दिव्यांगांच्या हितासाठी नवीन धोरण तयार केले. परंतु, यामध्ये मूलभूत त्रुटी आहेत. मुख्य म्हणजे १८ वर्षांवरील अनाथ दिव्यांगाना मृत्यूपर्यंत बालगृहात ठेवण्याची तरतुदच नाही. संविधानात्मक सुरक्षाच नसल्याने जीवंत राहण्याची हमी नाही. यामुळे देशभरातील अशी हजारो दिव्यांग पुन्हा बेवारस होतील. माणुसकीचे हे नष्टचर्य थांबवायचे असेल तर नवीन दिव्यांग धोरणात सुधारणा करावी, यासाठी केंद्र सरकारने लोकसभेत ठराव मांडावा, अशी मागणी अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील अनाथांचा बाप शंकरबाबा पापळकर यांचे मानसपूत्र विधूर पापळकर यांनी केली. या अस्वस्थ प्रश्नाकडे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी चंद्रपुरात आले असता ते ‘लोकमत’ शी बोलत होते.देशभरात दिव्यांगांची संख्या लाखो तर जगात सुमारे सात कोटी आहे. शारीरिक व्यंगावर मात करून अर्थाजनाचे साधन मिळावे आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने गांभिर्याने लक्ष द्यावे म्हणून शंकरबाबा पापळकर मागील १४ वर्षांपासून सरकारशी कसा लढा देत आहेत, याची माहिती त्यांनी दिली.विधूर म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या दिव्यांग धोरणामुळे गरीब दिव्यांगांच्या वाट्याला काहीही येणार नाही. गरीब अथवा श्रीमंत कुणीही दिव्यांग असो त्यांच्या यातना मोठ्या आहेत. परंतु, भारतातील पराकोटीची आर्थिक व सामाजिक विषमता लक्षात घेतल्यास सध्याच्या केंद्रीय दिव्यांग धोरणाचा पुर्नविचार करावाच लागेल. या धोरणामुळे श्रीमंत आणि ज्यांना पालकत्व आहे, असे दिव्यांगच न्याय-हक्कांचे लाभार्थी होतील. मात्र, गरीब व अनाथ दिव्यांगाच्या वाट्याला काहीही येणार नाही. अनाथ दिव्यांगांना १८ वर्षे बालगृहात राहण्याची तरतूद आहे. त्यानंतर काय, याचा केंद्र सरकारने अजिबात विचार केला नाही. त्यामुळे हे धोरण उपेक्षित व अनाथ दिव्यांगांना न्याय देणारे नाही, याकडे विधूरने लक्ष वेधले. यावेळी परतवाडा येथील संत गाडगेबाबा मुकबधीर विद्यालयाचे अधीक्षक नंदकिशोर आकोलकर, गेंदीबाई श्रीनिवास अग्रवाल मतिमंद विद्यालयाचे विशेष शिक्षक अनिल पिसुलकर, गोपाल शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष आशा काळबांडे, अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधीर बालगृहाचे व्यवस्थापक जयगुरू गुुंदेकर यांनीही दिव्यांगांच्या विविध समस्यांची माहिती दिली.१२३ मुलांचा बाप१९९० रोजी वझ्झर येथे बाबांनी संत गाडगेबाबा मूकबधिर विद्यालय व मतिमंद शाळेची स्थापना केली. त्यानंतर दोन वर्षांनी बालगृह सुरू झाले. २० बेवारस व दिव्यांग मुलांना घेऊन सुरू झालेले बालगृह आज वटवृक्ष झाले. १२३ मूकबधिर विद्यार्थी शिक्षण घेतात. सर्व विद्यार्थ्यांच्या आधारकॉर्डवर बाप म्हणून शंकरबाबा पापळकर यांचे नोंदविले. त्यातला मीसुद्धा आहे. बाबांनी आतापर्यंत अनाथ २० मुलींची लग्ने लावून दिली.केवळ अनुदान नकोमाझे बाबा शंकरबाबा पापळकर हे अनाथांसाठी आश्रम चालवितात. आम्हाला केवळ अनुदान नको. केंद्र सरकारने दिव्यांगांच्या कल्याणासाठी कायद्यात सुधारणा करावी, एवढीच अपेक्षा असल्याचे विधूर पापळकर यांनी’ लोकमत’ ला सांगितले.पंतप्रधानांना एक लाख सह्यांचे निवेदन१८ वर्षांवरील अनाथ दिव्यांगांना आयुष्याच्या अंतापर्यंत बालगृहात ठेवावे, या मागणीसाठी शंकरबाबा पापळकर यांनी तीनदा पत्रव्यवहार केला. नागपूरच्या ग्रामायण संस्थेमार्फेत एक लाख सह्यांचे निवेदन पाठविले. पण समस्या जैसे थे आहे. देशातील लाखो दिव्यांगांना मतदानाचा अधिकार नाही, ही शोकांतिका आहे.