शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

ओबीसी जनगणनेचा ठराव महानगरपालिकेने आमसभेत मांडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

सन १८७१ ते १९३१ या ६० वर्षांत इंग्रज राजवटीत नियमित दर दहा वर्षांनी ओबीसीची जनगणना झाली आहे. १९३१ च्या शेवटच्या ओबीसी जनगणनेनुसार ओबीसीची संख्या ही ५२ टक्के आहे. २०२१ ची राष्ट्रीय जनगणना होऊ घातलेली आहे. या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणनेचा रकाना नसल्यामुळे अनेकदा ओबीसी समाजासाठी शासनाच्या मिळणाऱ्या योजनांचा व सरकारी धोरणांचा ओबीसी समाजाला लाभ मिळत नाही अथवा मिळणार नाही.

ठळक मुद्देनगरसेवकांचे महापौरांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आगामी २०२१ च्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव मनपा आमसभेत घ्यावा व त्या ठरावाद्वारे केंद्राकडे शिफारस करावी, ठरावाची एक प्रति रजिस्टर जनरललादेखील द्यावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक सचिन भोयर यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यानिशी महापौरांकडे दिले आहे.सन १८७१ ते १९३१ या ६० वर्षांत इंग्रज राजवटीत नियमित दर दहा वर्षांनी ओबीसीची जनगणना झाली आहे. १९३१ च्या शेवटच्या ओबीसी जनगणनेनुसार ओबीसीची संख्या ही ५२ टक्के आहे. २०२१ ची राष्ट्रीय जनगणना होऊ घातलेली आहे. या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणनेचा रकाना नसल्यामुळे अनेकदा ओबीसी समाजासाठी शासनाच्या मिळणाऱ्या योजनांचा व सरकारी धोरणांचा ओबीसी समाजाला लाभ मिळत नाही अथवा मिळणार नाही. ओबीसी लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे. अजूनही शासन ओबीसी १९३१ च्या आकडेवारीचा आधार घेत आहे.केंद्र सरकारला खरच ओबीसी समाजाला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास करायचा असेल तसेच ओबीसी समाजाला त्यांचे संवेधानिक अधिकार द्यायचे असेल तर सरकारकडे ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणनेचा आकडा असणे गरजेचे आहे. त्याशिवाय ओबीसी समाजाचा विकास करता येणार नाही. सुप्रिम कोर्टानेदेखील वारंवार केंद्र सरकारकडे निश्चित ओबीसीची आकडेवारी मागितली आहे.२०२१ मधील राष्ट्रीय जनगणना करतेवेळी नागरिकांच्या मागास प्रवर्गातील ओबीसी लोकसंख्येची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव चंद्रपूर महानगरपािलकेच्या आमसभेत मंजूर करून तो ठराव केंद्र सरकारकडे रजिस्ट्रार जनरल तसेच राज्य सरकारकडे पाठवावा. जेणेकरून ओबीसी समाजाप्रति केंद्र सरकार जागृत होईल. ओबीसीचा फक्त मतदानापुरता वापर न करता ओबीसी समाजाचा विकासाकडे केंद्र सरकार लक्ष देणार, असेही निवेदनात म्हटले आहे. नगरसेवक सचिन भोयर यांनी हा ठराव तयार करून सर्वपक्षीय नगरसेवकांच्या स्वाक्षºया घेतल्या.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती