शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार आदर्श ग्राम योजना गुंडाळण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:24 IST

चिमूर : केंद्र शासनाच्या धर्तीवर युती सरकारने राज्यात सुरू केलेली आमदार आदर्श ग्राम योजना गुंडाळण्याचा डाव शासनाने आखला आहे. ...

चिमूर : केंद्र शासनाच्या धर्तीवर युती सरकारने राज्यात सुरू केलेली आमदार आदर्श ग्राम योजना गुंडाळण्याचा डाव शासनाने आखला आहे. गाव निवड करण्याचे पत्रच जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाकडून प्राप्त न झाल्याने ही योजना बासनात गुंडाळणार, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील किमान तीन ग्रामपंचायतींचा विकास साधण्याचे उद्दिष्ट या योजनेत देण्यात आले होते. नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी आदर्श गाव निवडीची योजना खासदारांकरिता जाहीर केली. त्यानंतर राज्यांनीदेखील ही योजना आमदारांसाठी लागू केली. सुरुवातीच्या काळात सर्व आमदारांनी गावनिवडीचा उत्साह दाखविला. मागील दोन वर्षांपासून मात्र खासदारांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे समोर आले. याचीच री ओढत आमदारांनीदेखील या योजनेकडे कानाडोळा केला. आता तर नवीन सरकारने आमदारांना गाव निवडीचे आदेशच न दिल्याने ही योजना गुंडाळली जाणार, हे जवळपास नक्कीच झाले आहे.

बॉक्स

५७६ गावांचा विकास खुंटणार

राज्यातील २८८ आमदारांच्या वतीने आमदार आदर्श ग्राम योजनेतून एका तालुक्यातून एक गाव दत्तक असे एका विधानसभा क्षेत्रातून दोन गावाचा विकास या योजनेतून होत होता. मात्र महाविकास सरकारने अजूनही गावाच्या निवडीचे पत्रच जिल्हा प्रशासनास प्राप्त न झाल्याने राज्यातील २८८ विधानसभा क्षेत्रातील गावाचा विकास खुंटणार आहे.

कोट

आमदार आदर्श गाव योजना फडणवीस सरकारने सुरू केली होती. या योजनेतून अनेक गावात प्राथमिक सुविधेसह गावाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरत होती. मात्र महाविकास आघाडी सरकारला गावाचा विकास करायचा नाही तर गावातील नागरिकांचा फक्त मतासाठी वापर करायचा आहे. त्यामुळे ही चांगली योजना गुंडाळण्याचा प्रयत्न या सरकारने चालविला आहे.

-कीर्तीकुमार भांगडिया

आमदार, चिमूर विधानसभा क्षेत्र.