शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चा आज धडकणार

By admin | Updated: October 19, 2016 00:57 IST

कधी नव्हे पहिल्यांचा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी एकत्र आला आहे.

आरक्षण मिळालेच पाहिजे : मोर्चादरम्यान शहरात सर्व प्रकारची वाहतूक बंदचंद्रपूर : कधी नव्हे पहिल्यांचा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी एकत्र आला आहे. सर्व मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवऊन मराठा-कुणबी क्रांतीची धडक चंद्रपूर येथे १९ आॅक्टोबरला बसणार आहे. या मोर्चाची जय्यत तयारी सकल-मराठा कुणबी समाज समन्वय समितीने केली असून शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची दमछाक होणार आहे.कोपर्डी येथील बलात्कार व हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी देण्यात यावी, अ‍ॅट्रासिटी कायद्यामध्ये बदल करण्यात यावा, या दोन प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाज एकवटला आहे. त्याचे प्रतिबिंब चंद्रपूर जिल्ह्यातही पडले आहे. गेल्या १५ दिवसांपासून मोर्चाची जय्यत तयार करण्यात येत आहे. त्याकरिता मराठा समाजातील परंपरागत राजकीय नेतृत्त्व पडद्यामागे राहून तरुणांनी पुढाकार घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागात तयारीसाठी बैठकी घेण्यात आल्या आहेत.राज्य सरकारने मराठा आरक्षणाची बाजू न्यायालयात बरोबर मांडली नाही, ही सल मराठा तरूणांच्या मनात आहे. त्याच वेळी अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर वाढून अन्याय करण्यात येत असल्याची भावनाही निर्माण झाली आहे. या दोन्ही कारणांना ठोस उत्तर देण्यासाठी मराठा व कुणबी समाज एकत्र आला आहे. मोर्चाकरिता इतर समाजाचीही मदत घेतली जात आहे. त्यांनाही मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मोर्चात किती लोकं सहभागी होणार, याबाबत पोलीस अंदाज बांधत आहेत. त्यानुसार, पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोर्चेकऱ्यांच्या संख्येवरून चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंगळवारी पोलिसांनी मूक मोर्चा जाणार असलेल्या सर्व ठिकाणांची पहाणी केली. सर्व चौकात बाँबशोधक पथकाकडून सायंकाळी तपासणी करण्यात आली. चौकाचौकात पोलिसांचे पथक सायंकाळपासून तैनात करण्यात आले आहे. कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून शहरात लावण्यात आलेले विविध फलक, तोरणे दुपारी काढण्यात आली. (प्रतिनिधी)शाळा-महाविद्यालयांबाबत संभ्रममोर्चात लाखो लोकांचा सहभाग राहणार, असा अंदाज लक्षात घेऊन चंद्रपूर पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. बुधवारी सकाळी ६ वाजतापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून नागरिकांना ‘नो-व्हेईकल डे’ पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात आॅटो, ट्रॅव्हल्स व जड वाहनास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालयाची वाहने कशी पोहोचणार, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. प्रशासकीय कारणांमुळे शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासन घेऊ शकले नाही. मात्र, मोर्चाच्या आयोजकांनी शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.मोर्चाची सहावी आढावा बैठकमोर्चाच्या यशस्वीतेसाठी आयोजक डोळ्यात तेल घालून नियोजन करीत आहेत. मोर्चाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी सहावी आढावा बैठक तुकूम येथील मातोश्री सभागृहात घेण्यात आली. यावेळी अंतिम टप्प्याची माहिती देण्यात आली. म्हाडा कॉलनी मैदानावर महिला, पुरुष, स्वयंसेवक आणि विद्याथी-विद्यार्थिनींच्या बसण्याची व्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मोर्चा शिस्तबद्ध ठेवण्यावर भर देण्यात आला. मोर्चात सहभागी होणाऱ्यांना स्वत:च्या जेवनाचा डबा व पाण्याची व्यवस्था करण्याबाबत आयोजकांनी कळविले आहे.मोर्चाचा मार्ग असा राहणारमोर्चा म्हाडा कॉलनी, इरई नदी, विदर्भ हाऊसिंग चौक, संत केवलराम चौक, दवा बाजार, जटपुरा गेट, छोटा बाजार, जयंत टॉकीज, डॉ. आंबेडकर पुतळा, महात्मा गांधी पुतळा, गिरनार चौक, स्टेट बॅक चौक, मौलाना आझाद चौक, ज्युबिली शाळा, बेंगळूर बेकरी ते जटपुरा गेट या मार्गाने जाणार आहे. पुढे जिल्हा परिषद, प्रियदर्शी चौकातून चांदा क्लब ग्राऊंडवर मोर्चाचे रूपांतर सभेत होईल. राजकीय नेते राहतील मोर्चाच्या मागेया मोर्चाचे नियोजन करताना विद्यार्थिनी, युवती, महिलांना पुढे ठेवण्यात आले आहे. त्यानंतर विद्यार्थी, युवक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, इतर पुरुष यांना सहभागी केले जाईल. या सर्वांच्या शेवटी राजकीय नेत्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहेत.