शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जिवती तालुक्यात कृषी पर्यटन निर्माण करणार

By admin | Updated: May 19, 2017 01:14 IST

कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांनी समृद्ध, उन्नत, विकासित व अद्ययावत शाश्वत शेती करणे आवश्यक आहे.

संजय धोटे : शेतकरी संवाद कार्यक्रमात घोषणा लोकमत न्यूज नेटवर्क राजुरा : कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांनी समृद्ध, उन्नत, विकासित व अद्ययावत शाश्वत शेती करणे आवश्यक आहे. ही काळाची गरज असून ते आपले मिशन असावे. जिवती तालुक्याला कृषी पर्यटन विकासस्थळ निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. त्याकरिता आवश्यक तेवढे प्रयत्न करण्यात येतील, अशी घोषणा आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केली. आ अ‍ॅड. धोटे यांनी जिवती तालुक्यातील आदिवासी बहुल दुर्गम भागातील आंबेझरी येथे जाऊन पिसाराम मडावी यांच्या शेताच्या बांध्यावर शेतकऱ्याशी बुधवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेप्रमाणे टाटा ट्रस्टने निवडलेल्या आबेझरी गावातील सारिकाला अद्ययावत डाटा घेण्यासाठी संगणक देण्यात आले. त्यामुळे शासनाच्या ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ या धोरणाचा पुरस्कार करीत आगामी खरीप हंगामामध्ये विकसित शेतीकरिता नियोजन करण्यात यावे. शासनाच्या सर्व यंत्रांनी परस्परांशी समन्वय ठेवत शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाणी व वीज पंपाचे उपलब्ध करून ‘मागेल त्याला विहीर’ द्यावी. आधुनिक शेती तंत्रज्ञान पुरविण्यावर भर देण्यात यावा. तसेच शेतीला पूरक जोडधंदा उभा करुन शेती विकासित करावी, असे आवाहन आ. धोटे यांनी केले. लघु उद्योग निर्माण केल्याने काय होईल ,शेतीचे उत्पन वाढण्यास कशी मदत होईल, आदी विषयांवर उपस्थित मान्यवर सदस्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या समस्यांचे तत्काळ निवारण करण्याच्या निर्देशही आमदार धोटे यांनी दिले. त्यांनी सिंचनाची अतिरिक्त कामे घ्यावी, अशी नागरीकानी सूचना केली. या सूचनेची दखल घेत सिंचनाची कामे करण्यात यावी, असे निर्देश संबंधिताना देण्यात आले. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या सभापती गोदावरी केद्रे, जिवती प.स. उपसभापती महेश देवकते, तालुका भाजपा महामंत्री सुरेश केद्रे, इतर पदाधिकारी, तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी, आत्माच्या प्रकल्प संचालिका विद्या मानकर, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, महावितरणचे अधिकारी, तसेच विविध विभागाचे सहायक अधिकारी व शेतकरी, ग्रामस्थ, उपस्थित होते. शेतीच्या फायद्यासाठी तंत्रज्ञान अवगत करा शेतकऱ्यांना शेती क्षेत्राशी निगडीत चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय शेती फायद्यात येणार नाही. त्यामुळे नवीन तत्रज्ञान अवगत करुन नियोजन करताना दूध संकलन केंद्र, इतर लघु उद्योग, बी-बियाणे, रासायनिक खते, कर्जाचे पुनर्गठन, कर्जाची परतफेड, किसान क्रेडिट कार्ड वाटप, राज्य व केंद्राच्या विविध योजना, पंतप्रधान पीक विमा योजना, पशुधनाकरिता चारा नियोजन आदी सर्व क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे. त्यातून त्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी आपली सेवा द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.