शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

रूग्णवाढीचा आलेख घसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 5:00 AM

जुलै, ऑगस्टमध्ये चाचण्या वाढविण्यात आल्या. त्यामुळे रूग्णांची संख्याही वाढली. जिल्हा आरोग्य प्रशासनाने तपासणी, निदान व लवकर उपचार या त्रिसुत्रीचा प्रभावी वापर केल्याने रूग्णवाढीचा आलेख केवळ या आठवड्यात तरी खाली येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. १८ सप्टेंबर ते २४ डिसेंबर २०२० या सात दिवसात नवे रूग्ण दीडशे तर बरे होणाऱ्यांच्या प्रमाणातही मोठे अंतर नाही. गत आठवड्यात हीच संख्या मोठी होती. त्यामुळे हजारांवर पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात होती.

ठळक मुद्देदिलासादायक । कोरोना बाधितांचे मृत्यू रोखणे आरोग्य प्रशासनासमोर आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे आठवडाभरात संसर्गाचा आलेख घसरत असल्याचे दिलासादायक चित्र पुढे आले आहे. सात दिवसात १७३३ नवे रूग्ण आढळले. तर १०९७ व्यक्ती उपचारानंतर बरे झाले आहेत. १८ सप्टेंबरला सर्वाधिक ३०३ रूग्णांची नोंद झाली आहे. मात्र, कोराना बाधित गंभीर रूग्णांची संख्या दरदिवशी दोन ते तीन असल्याने नागरिकांमध्ये दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे.जुलै, ऑगस्टमध्ये चाचण्या वाढविण्यात आल्या. त्यामुळे रूग्णांची संख्याही वाढली. जिल्हा आरोग्य प्रशासनाने तपासणी, निदान व लवकर उपचार या त्रिसुत्रीचा प्रभावी वापर केल्याने रूग्णवाढीचा आलेख केवळ या आठवड्यात तरी खाली येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. १८ सप्टेंबर ते २४ डिसेंबर २०२० या सात दिवसात नवे रूग्ण दीडशे तर बरे होणाऱ्यांच्या प्रमाणातही मोठे अंतर नाही. गत आठवड्यात हीच संख्या मोठी होती. त्यामुळे हजारांवर पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात होती.आरोग्य प्रशासनाने याच कालावधीत चाचण्यांची संख्या वाढवली आहे. नागरिकांनी स्वत:हून तपासणीसाठी केंद्रात यावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याने चंद्रपूर शहरात तरी रामनगर व बाबुपेठ येथील चाचणी केंद्रात नागरिकांची संख्या वाढली. जुलै व ऑगस्टमध्ये संशयित रूग्ण शोध मोही राबविण्यात आली. लवकर तपासणी, लवकर निदान आणि लवकर उपचार ही त्रिसूत्रीचा वापर करण्यात आला. राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात माझे कुटुंंबमाझी जबाबदारी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे चाचण्यांचे प्रमाण वाढण्याचा अंदाज जिल्हा आरोग्य प्रशासनाने वर्तविला आहे.कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढमागील सात दिवसात रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. तालुका कोविड केअर सेंटर यासाठी उपयुक्त ठरले आहेत. या सेंटरमध्ये आरोग्य सुविधा वाढविल्यास पुन्हा चित्र बदलू शकेल, असा प्रशासनाचा दावा आहे.कोरोनामुक्तीसाठी ट्रीपल टी ही त्रिसूत्री वापरल्या जात आहे. मागील आठवड्यात कोरोना रूग्ण वाढीचा डबलिंग रेट १० होता. हा संसर्ग रेट १० पेक्षा जास्त असल्यास सप्टेंबर अखेरपर्यंत रूग्णांची संख्या २० हजार होण्याचा अंदाज आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी वर्तविला होता. शनिवारपर्यंत बाधितांची संख्या ९ हजार ३५० झाली आहे. कोरोनामुक्तीचा वेग असाच राहिल्यास दिलासादायक ठरू शकते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या