शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

अटी-शर्थीसह उद्योगांना हिरवाकंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता २४ एप्रिलपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याचे निर्देश आहे. उर्वरित सर्व दुकाने, उद्योग, दळणवळण बंद करण्यात आले. त्यानंतर आता राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे अशा जिल्ह्यांना वर्गवारीत ग्रिन झोन ठरविण्यात आले. या ग्रिन झोनमधील उद्योगांना सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र सोबतच काही अटीही लादण्यात आल्या.

ठळक मुद्देनिम्मे उद्योग बंदच : कमी कर्मचाऱ्यांमुळे उत्पादनावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र आणि राज्य शासनाने ग्रिन झोन असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांना सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र सोबतच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध अटी व शर्थीचे पालन करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे या अटी पाळत उद्योग सुरू करण्यात अनेक अडचणी येत असल्याने चंद्रपूर एमआयडीसीतील ५० टक्के उद्योग बंदच आहेत.कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता २४ एप्रिलपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याचे निर्देश आहे. उर्वरित सर्व दुकाने, उद्योग, दळणवळण बंद करण्यात आले. त्यानंतर आता राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे अशा जिल्ह्यांना वर्गवारीत ग्रिन झोन ठरविण्यात आले. या ग्रिन झोनमधील उद्योगांना सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र सोबतच काही अटीही लादण्यात आल्या. मात्र या अटींना अधीन राहून उद्योगात उत्पादन घेणे कठीण असल्याचे बहुसंख्य उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ८० पैकी ४० उद्योग अद्यापही बंदच आहे.या अडचणींचा सामनाउद्योगांमध्ये आधीच मोजके कर्मचारी ठेवले जातात. त्यातही ५० टक्के कर्मचाऱ्यांना सुटी देण्याचे आदेश असल्याने केवळ ५० टक्के कर्मचाºयांच्या भरोशावर उत्पादन घेणे शक्य होत नाही. १० ते १५ टक्के कर्मचारी उद्योजक कमी करू शकतात. याशिवाय उद्योगात काम करताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे प्रत्यक्षात शक्य नाही. उद्योगात वापरण्यात येणारा कच्चा माल बाहेरून बोलवावा लागतो. तो आणताना अनेक अडचणी येतात. लॉकडाऊनमुळे उत्पादित होणारा अर्धा माल विकला जात नाही. त्यामुळे चंद्रपूर एमआयडीसीतील ५० टक्के उद्योग बंदच ठेवण्यात आले आहे, अशी माहिती एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रुंगठा यांनी दिली.अशा आहेत अटीउद्योग सुरू करताना उद्योगात केवळ ५० टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल. ट्रान्सपोर्र्टींगसाठी येणाºया वाहनांना गेटवरच सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे. उद्योगात काम करताना सोशल डिस्टंन्सिंग पाळणे आवश्यक राहील. प्रत्येक कर्मचारी, कामगारांना सुरक्षा प्रदान करावी, अशा अनेक अटींचे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.सिमेंट उद्योजकांची नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात उद्योजकांना उद्योग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र ५० टक्के उपस्थिती, सोशल डिस्टंन्सिंग व कामगारांची सुरक्षा आदीबाबत दिशानिर्देशाचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतची सूचना उद्योजकांना देण्यात आली आहे.-डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी, चंद्रपूर.सिमेंट उद्योगांना सुरुवातचंद्रपूर जिल्ह्यात अनेक सिमेंट उद्योग आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग आतापर्यंत बंद होते. मात्र शासनाने २० एप्रिलपासून सिमेंट उद्योगांना सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार २० एप्रिलपासून सिमेंट उद्योग सुरू करण्यात आले आहे. मात्र या उद्योगात केवळ ५० टक्केच कर्मचारी कार्यरत असणार आहेत.

टॅग्स :MIDCएमआयडीसी