शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

अटी-शर्थीसह उद्योगांना हिरवाकंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता २४ एप्रिलपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याचे निर्देश आहे. उर्वरित सर्व दुकाने, उद्योग, दळणवळण बंद करण्यात आले. त्यानंतर आता राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे अशा जिल्ह्यांना वर्गवारीत ग्रिन झोन ठरविण्यात आले. या ग्रिन झोनमधील उद्योगांना सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र सोबतच काही अटीही लादण्यात आल्या.

ठळक मुद्देनिम्मे उद्योग बंदच : कमी कर्मचाऱ्यांमुळे उत्पादनावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र आणि राज्य शासनाने ग्रिन झोन असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांना सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र सोबतच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध अटी व शर्थीचे पालन करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे या अटी पाळत उद्योग सुरू करण्यात अनेक अडचणी येत असल्याने चंद्रपूर एमआयडीसीतील ५० टक्के उद्योग बंदच आहेत.कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता २४ एप्रिलपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याचे निर्देश आहे. उर्वरित सर्व दुकाने, उद्योग, दळणवळण बंद करण्यात आले. त्यानंतर आता राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे अशा जिल्ह्यांना वर्गवारीत ग्रिन झोन ठरविण्यात आले. या ग्रिन झोनमधील उद्योगांना सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र सोबतच काही अटीही लादण्यात आल्या. मात्र या अटींना अधीन राहून उद्योगात उत्पादन घेणे कठीण असल्याचे बहुसंख्य उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ८० पैकी ४० उद्योग अद्यापही बंदच आहे.या अडचणींचा सामनाउद्योगांमध्ये आधीच मोजके कर्मचारी ठेवले जातात. त्यातही ५० टक्के कर्मचाऱ्यांना सुटी देण्याचे आदेश असल्याने केवळ ५० टक्के कर्मचाºयांच्या भरोशावर उत्पादन घेणे शक्य होत नाही. १० ते १५ टक्के कर्मचारी उद्योजक कमी करू शकतात. याशिवाय उद्योगात काम करताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे प्रत्यक्षात शक्य नाही. उद्योगात वापरण्यात येणारा कच्चा माल बाहेरून बोलवावा लागतो. तो आणताना अनेक अडचणी येतात. लॉकडाऊनमुळे उत्पादित होणारा अर्धा माल विकला जात नाही. त्यामुळे चंद्रपूर एमआयडीसीतील ५० टक्के उद्योग बंदच ठेवण्यात आले आहे, अशी माहिती एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रुंगठा यांनी दिली.अशा आहेत अटीउद्योग सुरू करताना उद्योगात केवळ ५० टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल. ट्रान्सपोर्र्टींगसाठी येणाºया वाहनांना गेटवरच सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे. उद्योगात काम करताना सोशल डिस्टंन्सिंग पाळणे आवश्यक राहील. प्रत्येक कर्मचारी, कामगारांना सुरक्षा प्रदान करावी, अशा अनेक अटींचे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.सिमेंट उद्योजकांची नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात उद्योजकांना उद्योग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र ५० टक्के उपस्थिती, सोशल डिस्टंन्सिंग व कामगारांची सुरक्षा आदीबाबत दिशानिर्देशाचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतची सूचना उद्योजकांना देण्यात आली आहे.-डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी, चंद्रपूर.सिमेंट उद्योगांना सुरुवातचंद्रपूर जिल्ह्यात अनेक सिमेंट उद्योग आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग आतापर्यंत बंद होते. मात्र शासनाने २० एप्रिलपासून सिमेंट उद्योगांना सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार २० एप्रिलपासून सिमेंट उद्योग सुरू करण्यात आले आहे. मात्र या उद्योगात केवळ ५० टक्केच कर्मचारी कार्यरत असणार आहेत.

टॅग्स :MIDCएमआयडीसी