शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

कर्ज काढून उभे केलेले गोटफार्म पावसात उद्ध्वस्त; युवकाचे स्वप्न पुरात वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2022 3:27 PM

वर्धा नदी फुगल्याने पूर आला व संपूर्ण गोटफार्म, शेती पाण्याखाली आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आशिष खाडे

पळसगाव (चंद्रपूर) : मागील काही दिवसांमध्ये शेतीला लागवड खर्च अधिक आणि उत्पादन कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच निसर्गसुद्धा साथ देत नसल्याची स्थिती आहे. शेतीला जोडधंदा म्हणून बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील मनोज वसंत देरकर (२७) यांनी भाडेतत्त्वावर शेती घेऊन जंगलालगत गोटफॉर्म सुरू केले. पण, आलेल्या पुरामुळे त्याचे मोठे नुकसान झाले असून, बघितलेले स्वप्न पुरात वाहून गेले.

बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील मनोज देरकर यांनी नोकरीच्या मागे न धावता कर्ज घेऊन स्वतःचा गोटफार्म सुरू केला. यासाठी त्याने शेतीसुद्धा भाडेतत्त्वावर घेतली. व्यवसायाला सुरुवात करून अगदी चार महिने झाले. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाच्या जोरावर शेतामध्ये विविध प्रकारचा भाजीपाला लावला. यासोबतच गोटफार्ममध्ये कुक्कुटपालनदेखील सुरू केले होते. मात्र, ७ जुलैला वरुणराजा कोपल्याने ढगफुटीसारखी स्थिती होती. वर्धा नदी फुगल्याने पूर आला व संपूर्ण गोटफार्म, शेती पाण्याखाली आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता शेतीचे भाडे, सोबतच झालेला खर्च काढायचा कुठून, हा प्रश्न त्याला पडला आहे. त्यामुळे शासनाने मदत करण्याची मागणी केली जात आहे.

शेती परवडत नसल्याने जोडधंदा म्हणून कर्ज काढून गोटफार्म सुरु केले. शेती भाड्याने घेतली. यामध्ये भाजीपाला, कुक्कुटपालन सुरू केले. मात्र आलेल्या पुरामुळे सर्वकाही गेले. त्यामुळे शासनाने मदत केल्यास पुन्हा व्यवसाय उभा करणे शक्य होईल.

- मनोज देरकर, शेतकरी, पळसगाव

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस