शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

चंद्रपूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत ताडोबा दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 12:59 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत १७ सप्टेंबर २०१६ पासून चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क शैक्षणिक सहल घडविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थीदशेतच कळावे जंगलाचे महत्त्व वनाचे रक्षण करा-सुधीर मुनगंटीवार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वन्यजीव व वनसंवर्धनासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या जाणिवा अधिक समृद्ध होण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत १७ सप्टेंबर २०१६ पासून चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क शैक्षणिक सहल घडविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वन्यप्राणी, वनाचे वैभव आणि महत्त्व विद्यार्थ्यांना लहाणपणापासूनच कळावे, हा या उपक्रमामागील उद्देश.हमखास व्याघ्र दर्शनासाठी ताडोबा प्रकल्पाला देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकदेखील भेट देत असतात. चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणे शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थी या महत्त्वाच्या वन पर्यटनापासून वंचित राहतात. वास्तविक पाहता चंद्रपूर जिल्ह्यातील वनसंवर्धन व व्याघ्र संवर्धनामध्ये वनाजवळ राहणाऱ्या गावकऱ्यांची महत्त्वाची भूमिका आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना व्याघ्र प्रकल्प तसेच वनसंवर्धनाचे महत्त्व समजणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा, आश्रमशाळा, अनाथ आश्रमातील विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी अशा सर्व विद्यार्थ्यांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नि:शुल्क शैक्षणिक सहल घडविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शाळेपासून नेण्याची व आणण्याची सुविधा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांमार्फत करण्यात येणार असून दरवर्षी साधारणत: सहा हजार विद्यार्थ्यांना या उपक्रमाला लाभ मिळणार आहे. हा उपक्रम वर्ग ४ ते वर्ग १० च्या विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) या कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे.शासनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंद आहे. त्यांनाही जंगलाविषयी आवड निर्माण झाली आहे.

आगरझरी बटरफ्लाय गार्डनचे आकर्षण वेगळेचताडोबातील पराक्रमी वाघ, शेकडो अन्य वन्यजीव, विपुल वनसंपदा, पक्ष्यांच्या शेकडो प्रजाती बघून आल्यानंतर कुटुंबासह ताडोबा परिसरात पर्यटकांना आयुष्यावर प्रेम करायला शिकविणारे मनमोहक फुलपाखरांचे जग सध्या वेडावत आहे. वनविभागाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत आगरझरी येथे बहुरंगी बटरफ्लाय वर्ल्ड निर्माण केले आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील गावांना रोजगार मिळत आहे. फुलपाखरू उद्यान व त्याच्या शेजारीच माहिती केंद्र आहे. शिवाय यापूर्वी उभारण्यात आलेले विद्यार्थ्यांसाठीचे प्रशिक्षण केंद्र येथे येणाºया पर्यटकाला आकर्षित करते. चंद्रपूर व आसपासच्या शहरातील नागरिकांना आपल्या चिमकुल्यासोबत फिरण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ बटरफ्लॉय गार्डनमुळे निर्माण झाले.

चंद्रपूर जिल्हा हा जंगलाचा जिल्हा आहे. वनसंपदेने नटलेला जिल्हा आहे. येथील शालेय विद्यार्थ्यांना व्याघ्र प्रकल्प तसेच वनसंवर्धनाचे महत्त्व समजणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा, आश्रमशाळा, अनाथ आश्रमातील विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी अशा सर्व विद्यार्थ्यांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नि:शुल्क शैक्षणिक सहल घडविण्याचा उपक्रम सुरू करण्याचा वनमंत्री म्हणून आपला मानस होता. तो सुरू करण्यात आला आहे.-सुधीर मुनगंटीवार,अर्थ, नियोजन व वनेमंत्री महाराष्ट्र राज्य.-गणेश आमले, नांदगाव.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प