शहरं
Join us  
Trending Stories
1
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
2
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार
5
Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण
6
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
7
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
8
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
9
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
10
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
11
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
12
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
13
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
14
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
15
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
16
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
17
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
18
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
19
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
20
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांकडून भरून घेणार प्रपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:41 AM

भरघोस उत्पन्न मिळेल या आशेने बीटी कापूस बियाणे वापरणाºया शेतकºयांना यंदा बोंड अळीने हैराण केले.

ठळक मुद्देकपाशीला बोंडअळीचा विळखा : भरपाईसाठी करता येणार दावा

राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : भरघोस उत्पन्न मिळेल या आशेने बीटी कापूस बियाणे वापरणाºया शेतकºयांना यंदा बोंड अळीने हैराण केले. जिल्ह्यातील कपाशीचे लागवड क्षेत्र वाढत असतानाच बोंड अळीने कपाशीवर आक्रमण केल्यावर नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी विभागाने शेतकºयांकडून आता प्रपत्र भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, राजुरा, गोंडपिपरी, कोरपना या तालुक्यात यंदा कापसाचे लागवड क्षेत्र वाढले. धान उत्पादक म्हणून ओळखणाऱ्या ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल व सावली तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. जादा उत्पन्न मिळेल, या आशेने बीटी-२ या बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. मात्र, हे बियाणे यंदाच्या बदलत्या वातावरणात तग धरू शकले नाही. याचा जोरदार फटका कपाशीच्या उगवण क्षमतेवर झाला. शिवाय झाडाला बोंडे लागल्यानंतर गुलाबी बोंड अळीने विळखा घातला. त्यामुळे कपाशीचे बोंड काळपट झाले. यातून हेक्टरी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.राजुरा, कोरपना तालुक्यातील त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीच्या प्रार्दुभाव झाल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या तक्रारींचा ओघ वाढतच असल्याचे सध्या दिसून येत आहे. या तक्रारीची दखल घेवून कृषी विभागाच्या तपासणी पथकाने शेतशिवाराची पाहणी सुरू केली. दरम्यान, बोंड अळीच्या तक्रारीची संख्या अधिक असल्याने आता प्रपत्र भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे.असे आहे प्रपत्रनमुना-जी नियम १२ (१) नुसार शेतकºयांकडून हे प्रपत्र भरून घेण्यात येणार आहे. बियाणे कुठून खरेदी केले, प्लॉट क्रमांक, किती एकरांत लागवड केली, उगवण क्षमता कशी होती, याची नोंदणी या प्रपत्रातून घेण्यात येणार आहे. या प्रपत्राला ‘चार-ए प्रपत्र’ असे नाव देण्यात आले आहे.प्रपत्रातून होणार नुकसानीचे मुल्यांकनगुलाबी बोंड अळीच्या नुकसानीसंदर्भात माहिती घेण्यासाठी तसेच पिकाचे मुल्यमापन करण्यासाठी या प्रपत्राद्वारे नुकसानीचा दावा करता येणार आहे. बीटी कंपनीने भरपाईसाठी नकार दिल्यास संबंधित शेतकºयाला न्यायालयात दाद मागता येणार आहे.सीसीआयचा आदेश धाब्यावरबीटी-२ तंत्रज्ञानाद्वारे निर्माण केलेल्या कपाशी बियाणे संदर्भात केंद्रीय कापूस संस्थेने (सीसीआय) डिसेंबर २०१५ ला मार्गदर्शक सूचना जारी केले होते. या सूचनेला अनुसरूनच बीटी बियाणे वापरत असताना खबरदारी घेण्याचे राज्य शासनाने मान्य केले. त्यानुसार एक आदेशही देण्यात आला होता. मात्र, या आदेशाचे पालन न झाल्याने कृषी व्यवसायिक व दलालांच्या मार्फतीने बीटी बियाणे शेतकºयांच्या माथी मारण्यात आले. त्यामुळे ही गुलाबी बोंड अळी शेतीच्या जीवावर उठली आहे.