शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

जबरानजोतधारकांचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:26 PM

अनुसुचित जाती व इतर पांरपरिक वनवासी वनहक्क कायद्यातंर्गत शेतकऱ्यांना वनजमिनीचे पट्टे मिळावे आणि विविध प्रलंबित समस्या तातडीने सोडवावे, या मागणीकरिता उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात जबरानजोतधारक शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देसमस्यांकडे वेधले लक्ष : तीन पिढ्यांची अट रद्द करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंंद्रपूर : अनुसुचित जाती व इतर पांरपरिक वनवासी वनहक्क कायद्यातंर्गत शेतकऱ्यांना वनजमिनीचे पट्टे मिळावे आणि विविध प्रलंबित समस्या तातडीने सोडवावे, या मागणीकरिता उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात जबरानजोतधारक शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम २००६ च्या कायद्यातंर्गत जिल्ह्याल शेतकºयांना जमिनीचे पट्टे द्यावे, कसत असलेल्या वनजमिनीवरचा कब्जा हटविण्यासाठी शेतकºयांवर दबाव टाकणाºयांना अधिकाºयांना आळा घालावा, शेतीचा पुरावा सिद्ध करण्यासाठी तिन पिढ्यांची अट रद्द करावी, आदिवासी विकास मंत्रालयाने १ जानेवारी २००८ रोजी जारी केलेल्या अधिसुचनेच्या कलम १३ (१) (झ) अनुसार मागणीदार खेरीज अन्य वडीलधाºया व्यक्तीचे लेखानिविष्ट कथन हा पुरावा ग्राह्य धरावा आणि शेतीचे पट्टे द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष राजु झोडे यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर यांना दिले.यावेळी विठ्ठल लोनबले, गजानन आयलनावार, सविता वाटगुरे, दर्शना वाळके, सुलोचना कोवे,रूपेश निमसरकार,प्रशांत उराडे आदी उपस्थित होते. हा मोर्चा शहरातील महात्मा गांधी चौकातून निघाला.