शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

नदीवर पहिल्यांदाच बंधाऱ्याची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 22:05 IST

राजू गेडाम । लोकमत न्यूज नेटवर्क मूल : पावसाळ्यात पावसाचे पाणी आल्यानंतर ते अडून न राहता इतरत्र वाहून जाते. ...

ठळक मुद्दे३.९३ लक्ष घनमीटर पाण्याची साठवण : अंधारी नदीवर सुरू आहे बांधकाम

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : पावसाळ्यात पावसाचे पाणी आल्यानंतर ते अडून न राहता इतरत्र वाहून जाते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची आवश्यकता भासते. पावसाचे पाणी अडून राहावे व त्याचा उपयोग शेतीबरोबरच इतरही व्यवसायाला व्हावे, या दृष्टीने राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने मूल ताजलुक्यातील चिरोली गावाजवळील अंधारी नदीवर सिमेंट बंधाऱ्याची निर्मिती होणार आहे. शेतकºयांना वरदान ठरणाऱ्या या बांधाऱ्यामुळे ३.९३ लक्ष घनमीटर पाण्याची साठवण होणार आहे. यापूर्वी सिंचन विभागांतर्गत बंधाऱ्याचे बांधकाम केले जात होते. या बंधाºयाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असून चंद्रपूर जिल्ह्यातील नदीवरील हा पहिलाच सिमेंट बंधारा असणार आहे.मूल तालुक्यातील चिरोली गावाजवळील सुशी, पोंभूर्णा, चिंतलधाबा पोडसा ते राज्यसीमा (राज्य ३६९) रस्त्यावरील अंधारी नदीवर ९० मीटर लांबीचा उंच पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने सन २०१५-१६ या वर्षात बांधला. सदर पुलालगत सिमेंट बंधारा बांधण्यात यावा. जेणेकरून शेतकऱ्यांवर शेती व्यवसायाबरोबरच इतर व्यवसायाला जोड देता येईल, अशी मागणी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. शेतकऱ्यांची आवश्यकता बघून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यसभा खासदार अनु अगा यांच्या स्थानिक विकास निधीतून १३ आॅक्टोबर २०१७ च्या आदेशान्वये १११.०५ लक्ष किमतीच्या बांधाऱ्याला प्रशासकीय मान्यता दिली. या बंधाºयाची लांबी ९० मीटर असून गेटची उंची ३.५० मीटर आहे. या बंधाऱ्यांमुळै ३.९३ घनमीटर म्हणजे ३९३ टीसीएम पाण्याची साठवण होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नदीवर हा पहिलाच सिमेेंट बंधारा बांधला जात असून भविष्यात नदीवर असल्याप्रकारचे बंधारे बांधून पाण्याची क्षमता वाढविली जाणार असल्याचे बोलले जात आहे.बंधारा होणार स्थानिक स्वराज्य संस्थेला हस्तांतरितसदर बांधकामाला सुरूवात झाली असून एप्रिल २०१९ पर्यंत सदर बंधाऱ्यांचे काम पूर्णत्वास येणार आहे. ७०.४४ टक्के निधीमध्ये सदर बंधाºयांचे काम पूर्ण होणार आहे. म्हणजे २९.५६ टक्के निधीची बचत होणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षे बंधाऱ्यांची देखभाल व सनियंत्रण संबंधित कंत्राटदाराकडे राहणार आहे. त्यानंतर सदर बंधारा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित केला जाणार आहेशेतकऱ्यांना वरदान ठरू पाहणारा अंधारी नदी जवळील सिमेंट बंधाऱ्यांचे काम एप्रिल २०१९ मध्ये पुर्णत्वास येणार आहे. या बंधाऱ्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढणार असून शेती उद्योगाबरोबरच मासेमारी व्यवसायासाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.- रूपेश बोदले, सहा. अभियंता बांधकाम विभाग, मूल