शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

नदीवर पहिल्यांदाच बंधाऱ्याची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 22:05 IST

राजू गेडाम । लोकमत न्यूज नेटवर्क मूल : पावसाळ्यात पावसाचे पाणी आल्यानंतर ते अडून न राहता इतरत्र वाहून जाते. ...

ठळक मुद्दे३.९३ लक्ष घनमीटर पाण्याची साठवण : अंधारी नदीवर सुरू आहे बांधकाम

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : पावसाळ्यात पावसाचे पाणी आल्यानंतर ते अडून न राहता इतरत्र वाहून जाते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची आवश्यकता भासते. पावसाचे पाणी अडून राहावे व त्याचा उपयोग शेतीबरोबरच इतरही व्यवसायाला व्हावे, या दृष्टीने राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने मूल ताजलुक्यातील चिरोली गावाजवळील अंधारी नदीवर सिमेंट बंधाऱ्याची निर्मिती होणार आहे. शेतकºयांना वरदान ठरणाऱ्या या बांधाऱ्यामुळे ३.९३ लक्ष घनमीटर पाण्याची साठवण होणार आहे. यापूर्वी सिंचन विभागांतर्गत बंधाऱ्याचे बांधकाम केले जात होते. या बंधाºयाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असून चंद्रपूर जिल्ह्यातील नदीवरील हा पहिलाच सिमेंट बंधारा असणार आहे.मूल तालुक्यातील चिरोली गावाजवळील सुशी, पोंभूर्णा, चिंतलधाबा पोडसा ते राज्यसीमा (राज्य ३६९) रस्त्यावरील अंधारी नदीवर ९० मीटर लांबीचा उंच पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने सन २०१५-१६ या वर्षात बांधला. सदर पुलालगत सिमेंट बंधारा बांधण्यात यावा. जेणेकरून शेतकऱ्यांवर शेती व्यवसायाबरोबरच इतर व्यवसायाला जोड देता येईल, अशी मागणी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. शेतकऱ्यांची आवश्यकता बघून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यसभा खासदार अनु अगा यांच्या स्थानिक विकास निधीतून १३ आॅक्टोबर २०१७ च्या आदेशान्वये १११.०५ लक्ष किमतीच्या बांधाऱ्याला प्रशासकीय मान्यता दिली. या बंधाºयाची लांबी ९० मीटर असून गेटची उंची ३.५० मीटर आहे. या बंधाऱ्यांमुळै ३.९३ घनमीटर म्हणजे ३९३ टीसीएम पाण्याची साठवण होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नदीवर हा पहिलाच सिमेेंट बंधारा बांधला जात असून भविष्यात नदीवर असल्याप्रकारचे बंधारे बांधून पाण्याची क्षमता वाढविली जाणार असल्याचे बोलले जात आहे.बंधारा होणार स्थानिक स्वराज्य संस्थेला हस्तांतरितसदर बांधकामाला सुरूवात झाली असून एप्रिल २०१९ पर्यंत सदर बंधाऱ्यांचे काम पूर्णत्वास येणार आहे. ७०.४४ टक्के निधीमध्ये सदर बंधाºयांचे काम पूर्ण होणार आहे. म्हणजे २९.५६ टक्के निधीची बचत होणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षे बंधाऱ्यांची देखभाल व सनियंत्रण संबंधित कंत्राटदाराकडे राहणार आहे. त्यानंतर सदर बंधारा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित केला जाणार आहेशेतकऱ्यांना वरदान ठरू पाहणारा अंधारी नदी जवळील सिमेंट बंधाऱ्यांचे काम एप्रिल २०१९ मध्ये पुर्णत्वास येणार आहे. या बंधाऱ्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढणार असून शेती उद्योगाबरोबरच मासेमारी व्यवसायासाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.- रूपेश बोदले, सहा. अभियंता बांधकाम विभाग, मूल