शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

नदीवर पहिल्यांदाच बंधाऱ्याची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 22:05 IST

राजू गेडाम । लोकमत न्यूज नेटवर्क मूल : पावसाळ्यात पावसाचे पाणी आल्यानंतर ते अडून न राहता इतरत्र वाहून जाते. ...

ठळक मुद्दे३.९३ लक्ष घनमीटर पाण्याची साठवण : अंधारी नदीवर सुरू आहे बांधकाम

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : पावसाळ्यात पावसाचे पाणी आल्यानंतर ते अडून न राहता इतरत्र वाहून जाते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची आवश्यकता भासते. पावसाचे पाणी अडून राहावे व त्याचा उपयोग शेतीबरोबरच इतरही व्यवसायाला व्हावे, या दृष्टीने राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने मूल ताजलुक्यातील चिरोली गावाजवळील अंधारी नदीवर सिमेंट बंधाऱ्याची निर्मिती होणार आहे. शेतकºयांना वरदान ठरणाऱ्या या बांधाऱ्यामुळे ३.९३ लक्ष घनमीटर पाण्याची साठवण होणार आहे. यापूर्वी सिंचन विभागांतर्गत बंधाऱ्याचे बांधकाम केले जात होते. या बंधाºयाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असून चंद्रपूर जिल्ह्यातील नदीवरील हा पहिलाच सिमेंट बंधारा असणार आहे.मूल तालुक्यातील चिरोली गावाजवळील सुशी, पोंभूर्णा, चिंतलधाबा पोडसा ते राज्यसीमा (राज्य ३६९) रस्त्यावरील अंधारी नदीवर ९० मीटर लांबीचा उंच पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने सन २०१५-१६ या वर्षात बांधला. सदर पुलालगत सिमेंट बंधारा बांधण्यात यावा. जेणेकरून शेतकऱ्यांवर शेती व्यवसायाबरोबरच इतर व्यवसायाला जोड देता येईल, अशी मागणी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. शेतकऱ्यांची आवश्यकता बघून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यसभा खासदार अनु अगा यांच्या स्थानिक विकास निधीतून १३ आॅक्टोबर २०१७ च्या आदेशान्वये १११.०५ लक्ष किमतीच्या बांधाऱ्याला प्रशासकीय मान्यता दिली. या बंधाºयाची लांबी ९० मीटर असून गेटची उंची ३.५० मीटर आहे. या बंधाऱ्यांमुळै ३.९३ घनमीटर म्हणजे ३९३ टीसीएम पाण्याची साठवण होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नदीवर हा पहिलाच सिमेेंट बंधारा बांधला जात असून भविष्यात नदीवर असल्याप्रकारचे बंधारे बांधून पाण्याची क्षमता वाढविली जाणार असल्याचे बोलले जात आहे.बंधारा होणार स्थानिक स्वराज्य संस्थेला हस्तांतरितसदर बांधकामाला सुरूवात झाली असून एप्रिल २०१९ पर्यंत सदर बंधाऱ्यांचे काम पूर्णत्वास येणार आहे. ७०.४४ टक्के निधीमध्ये सदर बंधाºयांचे काम पूर्ण होणार आहे. म्हणजे २९.५६ टक्के निधीची बचत होणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षे बंधाऱ्यांची देखभाल व सनियंत्रण संबंधित कंत्राटदाराकडे राहणार आहे. त्यानंतर सदर बंधारा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित केला जाणार आहेशेतकऱ्यांना वरदान ठरू पाहणारा अंधारी नदी जवळील सिमेंट बंधाऱ्यांचे काम एप्रिल २०१९ मध्ये पुर्णत्वास येणार आहे. या बंधाऱ्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढणार असून शेती उद्योगाबरोबरच मासेमारी व्यवसायासाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.- रूपेश बोदले, सहा. अभियंता बांधकाम विभाग, मूल