शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
4
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
5
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
6
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
7
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
8
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
10
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
11
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
12
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
13
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
14
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
15
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
16
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
17
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
18
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
19
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
20
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

पारंपरिक पिकांकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:05 IST

जिल्ह्यात वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी नगदी पिकांकडे पाठ फिरवू लागला आहे. वारंवार घडणाºया वन्यप्राण्यांच्या घटनांमुळे शासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. वनविभागाचे वारंवार उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी धास्तावले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यात वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी नगदी पिकांकडे पाठ फिरवू लागला आहे. वारंवार घडणाऱ्या वन्यप्राण्यांच्या घटनांमुळे शासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. वनविभागाचे वारंवार उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही. परिणामी अनेक शेतकरी पुन्हा एकदा पारंपारिक पद्धतीच्या धान पिकाकडे वळत आहे.जिल्ह्यात धान उत्पादक शेतकºयांनी नगदी पिकाकडे वळून आपला उदरनिर्वाह करावा असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातो. परंतु वन्यप्राण्यांच्या वाढत्या समस्या, खताचे वाढते भाव यावर कोणत्याच उपाययोजना होत नसल्यामुळे शेतकºयांना नाईलाजास्तव पुन्हा एकदा पारंपारिक धान शेतीचा पर्याय निवडावा लागत आहे.शेतात वाढत्या रानडुकरांच्या संख्येमुळे शेतकऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतशिवारात दहशतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे. जिल्ह्यात नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात अन्य पिकाच्या लागवडीकडे शेतकरी वळत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. मात्र विभागाकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याने तसेच शासनाकडून योग्य मोबदलाही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा नगदी पिकाकडील कल कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सस्यांकडे विशेष लक्ष देवून त्यांना विविध पिकांकडे वळण्याचा सल्ला द्यावा, अशी मागणी केली जात आहे.वन्यप्राण्यांचा वाढता अधिवासधान, भाजीपाला, मिरची यासारख्या पिकांमुळे वन्यप्राण्यांचा शेतातील वावर वाढतो. परिणामी हरिण, रानडुकर, निलगाय, माकडांचे कळप हिरवा चारा व पाण्यासाठी सुरक्षीत जागा यामुळे अशा पिकांकडे आपला मोर्चा वळवितात. तसेच रात्रीच्या वेळी अस्वल, ससे, रानडुकर तसेच त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या शिकारीसाठी बिबट व लांडगे यांचाही वावर वाढतो.त्यामुळेचे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकरी व शेतमजुरांवर वन्यप्राण्याचा हल्ला झाल्याच्या घटना वाढल्या आहेत.तुटपुंजी मदतगेल्या काही वर्षांत पावसाची सततची अनियमितता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकºयांची धानपिकासह मिरची व अन्य पिकांच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. शासनाकडून हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दिवसेंदिवस वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेती करणे कठीण होत आहे. शासनाकडून तुटपूंजी मदत दिली जाते. त्यामुळे अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांसाठी परवडणारा नाही. तर पिकांचे संरक्षण आणि उपाययोजनाही शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी