शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
4
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
5
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
6
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
7
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
8
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
9
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
10
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
11
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
12
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
13
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
14
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
15
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
16
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
17
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
18
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
19
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
20
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी

पारंपरिक पिकांकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:05 IST

जिल्ह्यात वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी नगदी पिकांकडे पाठ फिरवू लागला आहे. वारंवार घडणाºया वन्यप्राण्यांच्या घटनांमुळे शासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. वनविभागाचे वारंवार उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी धास्तावले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यात वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी नगदी पिकांकडे पाठ फिरवू लागला आहे. वारंवार घडणाऱ्या वन्यप्राण्यांच्या घटनांमुळे शासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. वनविभागाचे वारंवार उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही. परिणामी अनेक शेतकरी पुन्हा एकदा पारंपारिक पद्धतीच्या धान पिकाकडे वळत आहे.जिल्ह्यात धान उत्पादक शेतकºयांनी नगदी पिकाकडे वळून आपला उदरनिर्वाह करावा असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातो. परंतु वन्यप्राण्यांच्या वाढत्या समस्या, खताचे वाढते भाव यावर कोणत्याच उपाययोजना होत नसल्यामुळे शेतकºयांना नाईलाजास्तव पुन्हा एकदा पारंपारिक धान शेतीचा पर्याय निवडावा लागत आहे.शेतात वाढत्या रानडुकरांच्या संख्येमुळे शेतकऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतशिवारात दहशतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे. जिल्ह्यात नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात अन्य पिकाच्या लागवडीकडे शेतकरी वळत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. मात्र विभागाकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याने तसेच शासनाकडून योग्य मोबदलाही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा नगदी पिकाकडील कल कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सस्यांकडे विशेष लक्ष देवून त्यांना विविध पिकांकडे वळण्याचा सल्ला द्यावा, अशी मागणी केली जात आहे.वन्यप्राण्यांचा वाढता अधिवासधान, भाजीपाला, मिरची यासारख्या पिकांमुळे वन्यप्राण्यांचा शेतातील वावर वाढतो. परिणामी हरिण, रानडुकर, निलगाय, माकडांचे कळप हिरवा चारा व पाण्यासाठी सुरक्षीत जागा यामुळे अशा पिकांकडे आपला मोर्चा वळवितात. तसेच रात्रीच्या वेळी अस्वल, ससे, रानडुकर तसेच त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या शिकारीसाठी बिबट व लांडगे यांचाही वावर वाढतो.त्यामुळेचे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकरी व शेतमजुरांवर वन्यप्राण्याचा हल्ला झाल्याच्या घटना वाढल्या आहेत.तुटपुंजी मदतगेल्या काही वर्षांत पावसाची सततची अनियमितता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकºयांची धानपिकासह मिरची व अन्य पिकांच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. शासनाकडून हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दिवसेंदिवस वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेती करणे कठीण होत आहे. शासनाकडून तुटपूंजी मदत दिली जाते. त्यामुळे अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांसाठी परवडणारा नाही. तर पिकांचे संरक्षण आणि उपाययोजनाही शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी