शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतरही मेटेगावचे नागरिक डांबरी रस्त्यापासून वंचित

By admin | Updated: April 26, 2015 01:48 IST

तालुका मुख्यालयापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या व घनदाट जंगलाच्या मध्यभागी वास्तव्यास असलेल्या ...

उदय गडकरी - सावलीतालुका मुख्यालयापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या व घनदाट जंगलाच्या मध्यभागी वास्तव्यास असलेल्या मेटेगावातील १० आदिवासी कुटुंबातील ५७ गावकऱ्यांची ही कहाणी आहे.स्वातंत्र्य पूर्व काळातील मेटेगाव साधनसंपत्तीने समृध्द व वनवैभवाने नटलेले गाव होते. त्या गावात पारंपरिक पद्धतीने लोखंड तयार करण्याचे काम चालायचे. हे परिसरात मिळत असलेल्या दगडांच्या अवशेषांवरून निदर्शनास येते. त्या काळात या गावाची लोकसंख्या ७११ इतकी असल्याची नोंद पोलीस ठाण्यात असल्याचे सांगण्यात येते. मात्र आज केवळ ५७ इतकीच लोकसंख्या असून दहा घरांची वस्ती आहे. परंतु स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांतही या गावाला जाण्यासाठी शासनाकडून रस्ता मिळाला नाही. हे त्या गावाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. जंगलातून पायवाट असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तर दररोज जंगली श्वापदांचा वावर या गावकऱ्यांमध्ये दहशत पसरवित आहे. दळणवळणाच्या सोईअभावी अचानक उद्भवलेल्या आजारांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.प्रस्तुत प्रतिनिधीने सदर गावाला भेट दिली असता अनेक बाबी उजेडात आल्या. मेटेगाव आज ज्या दयनिय परिस्थितीत आहे, त्याकडे पाहून स्वातंत्रपूर्व काळात या गावांमध्ये लोखंड निर्मिती होत असेल याची कुणी कल्पनाही करु शकत नाही. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी वास्तव्याला असताना तेथे पारंपरिक पद्धतीने लोखंड निर्मिती करण्यात येत असल्याचे निदर्शनात येत आहे. गावाच्या सभोवताल सुमारे अर्धा कि.मी. अंतरापर्यंत तशा प्रकारच्या लोखंड सदृष्य दगडांचे ढीग आढळून येतात. आढळून आलेल्या दगडांबद्दल अधिक माहिती जाणून घेतली असता लोखंड निर्मिती कशा पद्धतीने करायचे याबद्दल गावकरी अनभिज्ञ आहेत. मात्र शुद्ध लोखंडाच्या निर्मितीनंतर उरलेला मळ किंवा कच्चा माल असावा, असे दगडांच्या अवशेषांवरून निदर्शनास येते .आज या गावात आदिवासी समाजाची केवळ दहा घरे असून साध्या प्राथमिक शिक्षणाची सोयही या गावात झाली नाही. अडीच कि.मी. अंतरावर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. परंतु गावाच्या सभोवताल दुसऱ्या गावापर्यंत घनदाट जंगल असल्याने लहान मुलांना शाळेत पाठविणे शक्य नसल्याने गावातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत.