शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:58 IST

गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने शेतपिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. एकीकडे हरीतक्रांतीचे स्वप्न पाहतअसताना निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीवर अवकळा येत आहे. आता आॅगस्ट महिन्यातच पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊन त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाऊस बेपत्ता : निसर्ग शेतकऱ्यांना साथ देईना

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने शेतपिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. एकीकडे हरीतक्रांतीचे स्वप्न पाहतअसताना निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीवर अवकळा येत आहे. आता आॅगस्ट महिन्यातच पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊन त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतीला पावसाची नितांत गरज असताना पावसाने ऐनवेळी हुलकावणी दिली आहे. दहा-पंधरा दिवस दमदार पाऊस पडल्यानंतर नदी, नाले, ओसडूंन वाहू लागले होते. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. यात काही भागात शेतीला मोठा फटका बसला होता. मात्र आता पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी शेतीच संकटात सापडली आहे. आॅगस्ट महिन्याचा आठवडा उलटला आहे. दरवर्षी या महिन्यात चांगलाच पाऊस पडतो. परंतु, पाऊस दिवसेंदिवस शेतकºयांना हुलकावणी देत असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.पाऊस नसल्याने पिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असून उत्पादनात यावर्षी घट झाली तर शेतकरी पुन्हा कर्जाच्या कचाट्यात सापडेल, अशी शक्यता आहे. निसर्गाच्या पाण्यावर शेती करण्याचे दिवस आता जवळजवळ संपत आले आहे. निसर्ग शेतकºयांना साथ देत नाही. त्यामुळे कृषीक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवकळा आली आहे.पिक वाढणार नाही तर उत्पादन होणार कसे, अशी शेतकºयांना चिंता आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकºयाला पावसाची प्रतीक्षा लागली आहे.कसे पूर्ण होणार हरितक्रांतीचे स्वप्न?निसर्गाचा असा लहरीपणा कायम राहिल्यास त्याचा मोठा परिणाम शेतीवर होणार आहे. शेतकरी सुखी, समृद्धी होण्यासाठी शेतीची भरभराट होणे आवश्यक आहे. परंतु, निसर्ग शेतकºयांना साथ देत नसल्याने व सिंचनाची अपूरी सुविधा असल्याने दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारी होत आहे.शेतकºयांना पावसाची प्रतीक्षाचआॅगस्ट महिना आला तरी शेतकºयांना अजूनही पाऊस बेपत्ता असल्याने पिकांच्या वाढीकरिता पाण्याची नितांत गरज आहे. परंतु, पाऊस येत नसल्याने शेतकºयांना पावसाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.धानपिकांवरही दुष्काळाचे सावट ; रोवणी खोळंबलीमारोडा : मूल परिसरात गेल्या १५ दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याने धानपिकांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे. सुरू झालेले रोवणीची कामे खोळंबल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. पंधरा दिवसांपुर्वी पडलेल्या पावसाने कसे-बसे रोवणीचे काम आजपर्यंत सुरू होते. परंतु, आता पाणी आटले असून ज्यांच्याकडे मोटारपंप आहे, त्यांना विजेशी संघर्ष करुन रोवणीची कामे करावी लागत आहेत. परंतु जी शेती उंचवट्यावर व नहराच्या कालव्यांशी आहे, त्यांचे शेत कोरडे पडत आहे. चार दिवसापूर्वी मजूर मिळत नव्हते. आता शेतात पाणीच नसल्याने संकट उभे ठाकले आहे. या परिसरात धान हे मुख्य पीक असून अनेक शेतकºयांची चिंता वाढली आहे.