शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:58 IST

गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने शेतपिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. एकीकडे हरीतक्रांतीचे स्वप्न पाहतअसताना निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीवर अवकळा येत आहे. आता आॅगस्ट महिन्यातच पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊन त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाऊस बेपत्ता : निसर्ग शेतकऱ्यांना साथ देईना

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने शेतपिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. एकीकडे हरीतक्रांतीचे स्वप्न पाहतअसताना निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीवर अवकळा येत आहे. आता आॅगस्ट महिन्यातच पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊन त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतीला पावसाची नितांत गरज असताना पावसाने ऐनवेळी हुलकावणी दिली आहे. दहा-पंधरा दिवस दमदार पाऊस पडल्यानंतर नदी, नाले, ओसडूंन वाहू लागले होते. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. यात काही भागात शेतीला मोठा फटका बसला होता. मात्र आता पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी शेतीच संकटात सापडली आहे. आॅगस्ट महिन्याचा आठवडा उलटला आहे. दरवर्षी या महिन्यात चांगलाच पाऊस पडतो. परंतु, पाऊस दिवसेंदिवस शेतकºयांना हुलकावणी देत असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.पाऊस नसल्याने पिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असून उत्पादनात यावर्षी घट झाली तर शेतकरी पुन्हा कर्जाच्या कचाट्यात सापडेल, अशी शक्यता आहे. निसर्गाच्या पाण्यावर शेती करण्याचे दिवस आता जवळजवळ संपत आले आहे. निसर्ग शेतकºयांना साथ देत नाही. त्यामुळे कृषीक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवकळा आली आहे.पिक वाढणार नाही तर उत्पादन होणार कसे, अशी शेतकºयांना चिंता आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकºयाला पावसाची प्रतीक्षा लागली आहे.कसे पूर्ण होणार हरितक्रांतीचे स्वप्न?निसर्गाचा असा लहरीपणा कायम राहिल्यास त्याचा मोठा परिणाम शेतीवर होणार आहे. शेतकरी सुखी, समृद्धी होण्यासाठी शेतीची भरभराट होणे आवश्यक आहे. परंतु, निसर्ग शेतकºयांना साथ देत नसल्याने व सिंचनाची अपूरी सुविधा असल्याने दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारी होत आहे.शेतकºयांना पावसाची प्रतीक्षाचआॅगस्ट महिना आला तरी शेतकºयांना अजूनही पाऊस बेपत्ता असल्याने पिकांच्या वाढीकरिता पाण्याची नितांत गरज आहे. परंतु, पाऊस येत नसल्याने शेतकºयांना पावसाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.धानपिकांवरही दुष्काळाचे सावट ; रोवणी खोळंबलीमारोडा : मूल परिसरात गेल्या १५ दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याने धानपिकांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे. सुरू झालेले रोवणीची कामे खोळंबल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. पंधरा दिवसांपुर्वी पडलेल्या पावसाने कसे-बसे रोवणीचे काम आजपर्यंत सुरू होते. परंतु, आता पाणी आटले असून ज्यांच्याकडे मोटारपंप आहे, त्यांना विजेशी संघर्ष करुन रोवणीची कामे करावी लागत आहेत. परंतु जी शेती उंचवट्यावर व नहराच्या कालव्यांशी आहे, त्यांचे शेत कोरडे पडत आहे. चार दिवसापूर्वी मजूर मिळत नव्हते. आता शेतात पाणीच नसल्याने संकट उभे ठाकले आहे. या परिसरात धान हे मुख्य पीक असून अनेक शेतकºयांची चिंता वाढली आहे.