शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:58 IST

गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने शेतपिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. एकीकडे हरीतक्रांतीचे स्वप्न पाहतअसताना निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीवर अवकळा येत आहे. आता आॅगस्ट महिन्यातच पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊन त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाऊस बेपत्ता : निसर्ग शेतकऱ्यांना साथ देईना

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने शेतपिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. एकीकडे हरीतक्रांतीचे स्वप्न पाहतअसताना निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीवर अवकळा येत आहे. आता आॅगस्ट महिन्यातच पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊन त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतीला पावसाची नितांत गरज असताना पावसाने ऐनवेळी हुलकावणी दिली आहे. दहा-पंधरा दिवस दमदार पाऊस पडल्यानंतर नदी, नाले, ओसडूंन वाहू लागले होते. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. यात काही भागात शेतीला मोठा फटका बसला होता. मात्र आता पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी शेतीच संकटात सापडली आहे. आॅगस्ट महिन्याचा आठवडा उलटला आहे. दरवर्षी या महिन्यात चांगलाच पाऊस पडतो. परंतु, पाऊस दिवसेंदिवस शेतकºयांना हुलकावणी देत असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.पाऊस नसल्याने पिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असून उत्पादनात यावर्षी घट झाली तर शेतकरी पुन्हा कर्जाच्या कचाट्यात सापडेल, अशी शक्यता आहे. निसर्गाच्या पाण्यावर शेती करण्याचे दिवस आता जवळजवळ संपत आले आहे. निसर्ग शेतकºयांना साथ देत नाही. त्यामुळे कृषीक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवकळा आली आहे.पिक वाढणार नाही तर उत्पादन होणार कसे, अशी शेतकºयांना चिंता आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकºयाला पावसाची प्रतीक्षा लागली आहे.कसे पूर्ण होणार हरितक्रांतीचे स्वप्न?निसर्गाचा असा लहरीपणा कायम राहिल्यास त्याचा मोठा परिणाम शेतीवर होणार आहे. शेतकरी सुखी, समृद्धी होण्यासाठी शेतीची भरभराट होणे आवश्यक आहे. परंतु, निसर्ग शेतकºयांना साथ देत नसल्याने व सिंचनाची अपूरी सुविधा असल्याने दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारी होत आहे.शेतकºयांना पावसाची प्रतीक्षाचआॅगस्ट महिना आला तरी शेतकºयांना अजूनही पाऊस बेपत्ता असल्याने पिकांच्या वाढीकरिता पाण्याची नितांत गरज आहे. परंतु, पाऊस येत नसल्याने शेतकºयांना पावसाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.धानपिकांवरही दुष्काळाचे सावट ; रोवणी खोळंबलीमारोडा : मूल परिसरात गेल्या १५ दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याने धानपिकांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे. सुरू झालेले रोवणीची कामे खोळंबल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. पंधरा दिवसांपुर्वी पडलेल्या पावसाने कसे-बसे रोवणीचे काम आजपर्यंत सुरू होते. परंतु, आता पाणी आटले असून ज्यांच्याकडे मोटारपंप आहे, त्यांना विजेशी संघर्ष करुन रोवणीची कामे करावी लागत आहेत. परंतु जी शेती उंचवट्यावर व नहराच्या कालव्यांशी आहे, त्यांचे शेत कोरडे पडत आहे. चार दिवसापूर्वी मजूर मिळत नव्हते. आता शेतात पाणीच नसल्याने संकट उभे ठाकले आहे. या परिसरात धान हे मुख्य पीक असून अनेक शेतकºयांची चिंता वाढली आहे.