शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठात फलज्योतिषचा अभ्यासक्रम सुरू करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST

अ. भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी सिंदेवाही : भारतीय संविधानाच्या ‘कलम ५१ ए-एच’नुसार समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती, मानवतावाद व ...

अ. भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

सिंदेवाही : भारतीय संविधानाच्या ‘कलम ५१ ए-एच’नुसार समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती, मानवतावाद व पर्यावरणाविषयी आवड निर्माण करणे, हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. या उद्दिष्टांचा आधार घेऊनच आपला अभ्यासक्रम ठरविला जातो. असे असतानादेखील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्लीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘फलज्योतिष’ हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फलज्योतिष हे शास्त्र नाही, असे जगभरातील १८६ शास्त्रज्ञांनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम सुरू करू नये, अशी मागणी अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केली आहे.

फलज्योतिष हा अभ्यासक्रम सुरू करून हे विद्यापीठ विद्यार्थ्यांना दैववादी बनविणार आहे की काय?, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अशा अवैज्ञानिक, अचिकित्सक अभ्यासक्रमाला मान्यता देऊ नये, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सिंदेवाहीचे नायब तहसीलदार डी. जे. धात्रक यांच्यामार्फत पंतप्रधानांकडे केली आहे. या निवेदनात स्वामी विवेकानंद व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या फलज्योतिषविरोधी मतांचादेखील उल्लेख केला आहे. असा अभ्यासक्रम सुरू करून समाज अज्ञानाच्या खाईत लोटला जाईल, असेही या या निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन देताना अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, चंद्रपूर जिल्हा सहसचिव अनिल लोनबले, सिंदेवाही तालुका संघटक डेकेश्वर पर्वते, तालुका सचिव मोरेश्वर गौरकार, तालुका अध्यक्ष अंबादास मेश्राम, कोषाध्यक्ष तामदेव कावळे, महिला संघटिका राजश्री वसाके तथा सल्लागार मा. एन्. एम्. सोनुले प्रामुख्याने उपस्थित होते.