शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

उद्योगांनी केले जीवनदायिन्यांचे वाटोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात वनसंपदेसोबतच खनिज संपदाही विपूल आहे. त्यामुळे उद्योजकांनी चंद्रपूर जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. मात्र वनसंपदेकडे दुर्लक्ष करीत केवळ खनिज संपदेकडे सर्वांनी लक्ष केंद्रित केले. त्यामुळे जंगलाचा झपाट्याने ऱ्हास झाला. आतातर उद्योगांनी जलस्रोतांनाही बाधित करणे सुरू केले आहे. जिल्ह्यात लहानमोठे असे एकूण ७८८ उद्योग आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्याचे आरोग्य धोक्यात: वायू प्रदूषणाहून जलप्रदूषण गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक क्रांती झाली, हे खरे आहे; मात्र चंद्रपूरला औद्योगिक हब करण्याचा हा अट्टाहास जंगले भुईसपाट व जीवनदायिन्यांना ग्रहण लावत आहे. झरपट, इरई व वर्धा या नद्यांचे डोळ्यादेखत वाटोळे केले जात आहे. वाहत्या नद्यांचे पाणी निर्मळ, स्वच्छ अन् पवित्र असते, हा प्रमादच येथील मुर्दाड मानसिकतेने बिघडवून टाकला आहे. वाढत्या जलप्रदूषणाकडे आजच गांभीर्याने बघितले नाही तर पुढे या जीवनदायिन्यांनाच जिवंत ठेवणे अवघड होणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात वनसंपदेसोबतच खनिज संपदाही विपूल आहे. त्यामुळे उद्योजकांनी चंद्रपूर जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. मात्र वनसंपदेकडे दुर्लक्ष करीत केवळ खनिज संपदेकडे सर्वांनी लक्ष केंद्रित केले. त्यामुळे जंगलाचा झपाट्याने ऱ्हास झाला. आतातर उद्योगांनी जलस्रोतांनाही बाधित करणे सुरू केले आहे. जिल्ह्यात लहानमोठे असे एकूण ७८८ उद्योग आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणातून तब्बल ३७८ उद्योग नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करतील, इतपत प्रदूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील २१५ उद्योग मध्यम प्रदूषणकारी तर १६३ उद्योग अतिप्रदूषणकारी (रेड लेव्हल) आहेत. उद्योगांमधील प्रदूषणाची एवढी भयंकर स्थिती असतानाही यावर कुठलेच उपाय शोधण्यात आले नाही. त्यामुळे हे वायू प्रदूषण चंद्रपूरला देशपातळीवर घेऊन गेले. आता जलप्रदूषणातही जिल्हा कूप्रसिध्द होत आहे. वायू प्रदूषण तर थांबले नाही, मात्र जलप्रदूषणालातरी आताच थांबविणे गरजेचे झाले आहे. अन्यथा जिल्ह्यात आरोग्याची अशी समस्या निर्माण होईल, जी शासनालाही सोडविता येणार नाही.वर्धा, इरई नदीत सोडले जाते रसायनमिश्रित पाणीवरोरा तालुक्यातील वर्धा पॉवर, जीएमआरसारख्या उद्योगांचे रसायनमिश्रित पाणी दैवल नाल्यात सोडले जाते. पुढे हे पाणी वर्धा नदीला मिळते. कर्नाटका एम्टाचे दूषित पाणी कोंढा नाल्याद्वारे वर्धा नदीतच येते. कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक, मुरली अ‍ॅग्रो सिमेंट कंपन्या वर्धा नदीलाच प्रदूषित करीत आहेत. बल्लारपूर पेपरमीलही दोन ठिकाणाहून वर्धा नदीला प्रदूषित करीत आहे. वास्तविक हे सर्वच उद्योग वर्धा नदीवरच तग धरून आहेत. याच नदीचे पाणी वापरून उद्योग आपली चाके फिरवित असले तरी तिच्या स्वच्छतेविषयी त्यांनी कधीच सोयरसुतक दाखविले नाही. उद्योगातील रसायनमिश्रित पाणी सोडताना त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. मात्र कोणताच उद्योग या फंदात पडत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा तर केव्हाचाच धृतराष्ट्र झाला असल्याने त्यांना ही बाब कधी दिसू शकली नाही. दुसरीकडे चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरईचा वेकोलिने धिंगाना केला आहे. या नदीला वेकोलिने प्रदूषित तर केलेच; सोबत ओव्हरबर्डन टाकून तिचे नैसर्गिक पात्रच बदलवून टाकले आहे. चंद्रपुरातील ऐतिहासिक झरपट नदीचे स्थानिक जिल्हा व नगर प्रशासनानेच अस्तित्व संपविले आहे. या नदीचा सांडपाणी वाहून नेणारा नाला करण्याइतपत उदासीनता प्रशासनाने आजही कायम ठेवली आहे.नद्या स्वच्छतेबाबत प्रशासन उदासीनचंद्रपूर जिल्ह्यात वर्धा, पैनगंगा, शिरणा, उमा, झरपट, इरई यासारख्या नद्या वाहतात. पाण्याचे आणि पर्यायाने नद्यांचे महत्त्व सर्वांना ठाऊक आहे. सध्या या नद्या विविध कारणांमुळे प्रदूषित होत आहेत. मात्र जिल्हा प्रशासन या नद्यांविषयी गंभीर असल्याचे दिसत नाही. जिल्ह्यातील या नद्या स्वच्छतेसाठी एखादी मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेण्याची गरज आहे.

टॅग्स :riverनदी