शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:39 PM

शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यू, चिकन गुनिया, मलेरिया आदी संसर्गजन्य रोगांनी थैमान घातले आहे. याला शहरातील अस्वच्छता कारणीभूत आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता करावी, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेच्या वतीने केली असून यासंदर्भातील निवेदन आयुक्तांना दिले आहे.

ठळक मुद्देप्रतिबंधात्मक उपाययोजना करा : युवक काँग्रेसचे आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यू, चिकन गुनिया, मलेरिया आदी संसर्गजन्य रोगांनी थैमान घातले आहे. याला शहरातील अस्वच्छता कारणीभूत आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता करावी, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेच्या वतीने केली असून यासंदर्भातील निवेदन आयुक्तांना दिले आहे.शहरात ‘स्वच्छ भारत अभियान’ मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. मात्र अनेक प्रभागात अस्वच्छता आहे. नाल्या तुंडूब भरल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नसल्यामुळे त्या ठिकाणी डासांचा प्रादूर्भाव झपाट्याने होत आहे. याचाच परिणाम लहान मुलां-मुलींना, मोठ्या स्त्री-पुरुषांना डेंग्यु, चिकन गुनिया, मलेरिया, सारख्या रोगांना बळी पडावे लागत आहे. अनेक रुग्ण दागावल्याचीही माहिती आहे. याकडे मनपाने लक्ष देऊन फॉगींग मशीनद्वारे फवारणी करावी, स्वच्छतेबाबत जनजागृती करावी, शहरात स्वच्छता मोहिम राबवावी, नाल्याचा उपसा करावा, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशा मागणीचे निवेदन काँग्रेसतर्फे आयुक्तांना देण्यात आले.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात नगरसेवक अशोक नागपूरे, नगरसेवक देवेंद्र बेले, नगरसेवक निलेश खोब्रागडे, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, नगरसेवक प्रशांत दानव, स्वप्नील तिवारी, स्नेहल चालखुलकर आदी उपस्थित होते.रुग्णालये फुल्लशहरासह जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वायरल फ्ल्यू पसरल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयास शहरातील खासगी रुग्णालय फुल्ल झाली आहेत. चंद्रपुरातील शासकीय रुग्णालयात खांटाची संख्या कमी आणी रुग्णांची संख्या जास्त असल्याने रुग्णांना खाली झोपून उपचार घ्यावा लागत आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.