शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

५३ हजार ३३६ शेतकऱ्यांना ३१२ कोटी ४४ लाखांची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST

चंद्रपूर : खरीप हंगामात विविध बँकांतून एक लाख ४ हजार १६४ शेतकऱ्यांना ७५५.६४ कोटींचे खरीप पीक कर्ज वाटप झाले. ...

चंद्रपूर : खरीप हंगामात विविध बँकांतून एक लाख ४ हजार १६४ शेतकऱ्यांना ७५५.६४ कोटींचे खरीप पीक कर्ज वाटप झाले. गरीब व गरजू नागरिकांसाठी २२ शिवभोजन केंद्रातून सुमारे सहा लाख शिवभोजन थाळी केवळ पाच रुपये दरात उपलबध करून दिली. धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा अतिरिक्त ७०० रुपये बोनस देणारे महाराष्ट्राचे महाविकास आघाडी शासन हे देशातील एकमेव सरकार आहे. याचा थेट फायदा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे व सर्व विभागप्रमुख, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, ज्येष्ठ नागरिक, कोविड योद्धा पुरस्कार प्राप्त विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले, जिल्ह्यात कोरोनावर प्रभावी नियंत्रण ठेवले. पूरग्रस्त भागासाठी शासनातर्फे ४२ कोटीची मदत मंजूर करून त्यातील ३६ कोटी मदत वाटप केले. ५९ केंद्रांवरून आतापर्यंत चार लाख ३७ हजार क्विंटल धान खरेदी झाली. गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. प्रकल्पाकरिता एक हजार कोटीव्यतिरिक्त अधिकचे ५०० कोटी म्हणजे दरवर्षी दीड कोटी रुपये देण्यास मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शविल्याची माहितीही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली. सुरुवातीला संविधानामधील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या हस्ते कोविड योद्धा तसेच पोलीस दलातील एएसआय लिलेश्वर वऱ्हाडमारे व विजय बोरीकर यांना गुणवत्ता सेवा पदक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सत्कार केला. संचालन मोंटू सिंग व मंगला घागी यांनी केले.

बचत गटांना कर्ज वाटपात राज्यात अग्रेसर

बचत गटांना कर्ज वाटप करण्यात जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. पोषण अभियानामध्ये उत्तम काम करीत पाच हजार परसबागांची निर्मिती केली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात देशी विदेशी पर्यटक भेटीवर येतात. येथे पर्यटनाला चालना देण्यासाठी ताज ग्रुपबरोबर करार करून पंचतारांकित हॉटेल सुरू करण्यात येणार आहे. महेन्द्रा क्लब, लि-मेरीडीअन, रेडीसन ब्ल्यू यांसारखी पंचतारांकीत हॉटेल्स या भागात येऊ पाहत आहेत. यातून महसूल व रोजगाराच्या संधी वाढतील, असेही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.