शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

वरोऱ्यात कापसाची आवक वाढली

By admin | Updated: December 23, 2014 23:00 IST

कापसाला जागतिक बाजारपेठेत मागणी नसल्याने यानंतर कापसाला दरवाढ होणे कठीण आहे. यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातच वरोरा व्यापारपेठेत एकाच दिवशी

वरोरा : कापसाला जागतिक बाजारपेठेत मागणी नसल्याने यानंतर कापसाला दरवाढ होणे कठीण आहे. यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातच वरोरा व्यापारपेठेत एकाच दिवशी सात हजार क्विंटल कापूस विक्रीसाठी बाजारात आला. यावर्षात मोठ्या प्रमाणात कापसाची आवक वरोरा बाजारपेठेत आल्याने मागील अनेक वर्षांपासून वरोरा कापसाची बाजारपेठ मागे पडली. आता वरोरा कापूस बाजारपेठेला चांगले दिवस आल्याने रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे इतरही व्यवसाय तेजीत आल्याचे मानले जात आहे.मागील काही दशकात वरोरा ही कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखली जात होती. वरोरा शहरात चार, माढेळी, शेगाव येथे जिनिंग फॅक्टरी होत्या. त्यामुळे अनेक कुटुंबांना कायम स्वरूपी रोजगार मिळाला होता. परंतु आधुनिकीकरणात या सर्वच जिनिंग फॅक्टरी बंद पडल्या. त्या जागेवर निवासस्थाने झाल्याने अनेक कुटुंबाचे रोजगार हिसकाविल्या गेला. त्यामुळे मागील कित्येक वर्षांपासून कापसाची वरोरा येथील बाजारपेठ नामशेष झाली होती. त्यामुळे वरोरा शहरातील इतर व्यवसायिकांनाही त्याचा फटका बसला.सध्या वरोरा शहरात दोन व माढेळी येथे एक जिनिंग खाजगीरित्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अनेक कापूस उत्पादक शेतकरी वरोरा परिसरातील कापूस व्यापारपेठेकडे वळले आहे. वरोरा परिसरात जिनिंग सुरू झाल्याने कापसाच्या पेऱ्यातही मागील काही वर्षात वाढ झाली आहे. शासनाने यावर्षी कापसाला ४ हजार ५० रुपये प्रति क्विंटल भाव दिला आहे. हा भाव कमी असला तरी कापूस उत्पादकांना आता पर्याय नाही. या भागात उत्पादन खर्चही निघणे कठीण आहे. त्यामुळे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने कापसाला भाव वाढ मिळेल किंवा बोनस मिळेल या आशेने शेतकरी आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यासारखे आहे. कापूस दर वाढीची घोषणा होईल या आशेवर कापूस उत्पादक आहे. अनेकांनी कापूस मोठ्या प्रमाणात घरात साठवून ठेवला. अधिक दिवस झाल्यास कापसाची प्रतवारी खराब होत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कापूस विकायला सुरूवात केली. कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा अंतर्गत कापसाची आवक वाढली आहे. १९ डिसेंबरला ७ हजार क्विंटल कापूस व्यापारपेठेत आला असल्याने ही आवक विक्रमी मानली जात आहे. मागील कित्येक वर्षात वरोरा परिसरातील कापसाच्या व्यापारपेठेवर आलेली मरगळ आता दूर होणार आहे. जागतिक बाजारपेठेत कापूस गाठीला मागणी नसल्याने निर्यात बंद आहे. त्यामुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता धूसर आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. (तालुका प्रतिनिधी)