शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 5:00 AM

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार ७३३ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ६६ झाली आहे. सध्या १२५७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, मागील काही दिवसामध्ये रुग्णसंख्येच्या तुलनेमध्ये बरे होणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट जिल्ह्यात धोकादायक वळणावर आहे.

ठळक मुद्देजिल्हा लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर : तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, रविवारी जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक म्हणजेच, २१५ रुग्णांची नोंद करण्यात आली असून दोघांचा जीवसुद्धा गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात लाॅकडाऊन तर होणार नाही, ना अशी भिती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, शेजारील यवतमाळ, वर्धा तसेच नागपूरमध्ये कोरोना रुग्ण तसेच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हाही लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर असून नागरिकांनी वेळीच सतर्क होणे आता तरी गरजेचे झाले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार ७३३ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ६६ झाली आहे. सध्या १२५७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, मागील काही दिवसामध्ये रुग्णसंख्येच्या तुलनेमध्ये बरे होणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट जिल्ह्यात धोकादायक वळणावर आहे. रविवारी मृत झालेल्यामध्ये बालाजी वार्ड, चंद्रपूर येथील ६० वर्षीय पुरूष व ढुमने लेआऊट, गडचांदूर, येथील ७३ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.आतापर्यंत दोन लाख ५० हजार ९१९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख १९ हजार ८२४ नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४१० बाधितांचे मृत्यू झाले आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३७१, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या