शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

समाजहिताच्या कार्यक्रमात चंद्रपूर प्रथम असावे

By admin | Updated: September 3, 2016 00:32 IST

समाजाच्या हिताचे कोणतेही कार्यक्रम राबविताना राज्याचे अथवा देशाचे न समजता ते समाज हिताचे कार्यक्रम समजून...

सुधीर मुनगंटीवार : महाअवयवदान अभियानाचा समारोपचंद्रपूर : समाजाच्या हिताचे कोणतेही कार्यक्रम राबविताना राज्याचे अथवा देशाचे न समजता ते समाज हिताचे कार्यक्रम समजून जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवावा. अशा सामाजिक हिताच्या कार्यक्रमात आपला चंद्रपूर जिल्हा प्रथम राहावा, या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित महाअवयवदान जनजागृती अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक पी.एम.मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यु.व्ही.मुनघाटे व आयएमएचे अध्यक्ष डॉ.प्रमोद बांगडे उपस्थित होते.यावेळी ना. मुनगंटीवार यांनी महाअवयवदान जनजागृती अभियान कार्यक्रम हा तीन दिवसांचा नसून संपूर्ण ३६५ दिवस राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या अवयवदान अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करुन समाजाला जागृत केल्याने एका माणसापासून आठ व्यक्तींचे प्राण वाचू शकते. अशा अभियानामध्ये मोठया संख्येने नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. हे अवयवदान एक महान कार्य असून एका मृत व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जीवन देण्याइतके दुसरे कोणतेही पुण्याचे काम असू शकत नाही. याची जाण ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही अवयवदानाची चळवळ संपूर्ण देशात उभारली असल्याचेही ते म्हणाले. या अवयवदान अभियानाच्या जनजागृतीनिमित्त घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम कविता बिशोई, द्वितीय प्रणय वानकर, तृतीय सुरज गुरनुले यांना तर निबंध स्पर्धेत प्रफुल मेश्राम, निकिता ठेंगणे व राहुल काळे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आले. रांगोळी स्पर्धेत प्रतिभा राठोड, मुयरी वाघडे व प्रिया गिरी यांना पारितोषिक मिळाले. (प्रतिनिधी)