शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

"दारूबंदी मागे घेण्याचा निर्णय निराशाजनक; मंत्र्याच्या हट्टामुळे दारूबंदी रद्द"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 18:14 IST

महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे मुख्यमंत्र्यांना पत्रयापूर्वी चंद्रपुरातली दारूबंदी घेण्यात आली होती मागे

सेवाग्राम (वर्धा) : महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी मागे घेतली आहे. हा निर्णय निराशाजनक असल्याच्या आशयाचे पत्र महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी पाठविले आहे."दारूबंदीमुळे गुन्हेगारी व अवैध दारूची विक्री वाढते असा जावई शोध चंद्रपूरचे पालकमंत्री यांनी लावला आहे. त्याच पद्धतीचा अहवाल तथाकथित समितीकडून करून आणला. या निर्णयाच्या संदर्भात फेरविचार करावा. चंद्रपूर जिल्ह्यातील एक लाख महिलांनी दारूबंदीसाठी आंदोलन केले होते. ५८८ ग्रामपंचायतींनी तसे ठराव मंजूरही केले आहेत. जिल्हा परिषदेने एकमताने दारूबंदीसाठी ठराव केला. जिल्ह्यातील विचारवंत व विधायक कार्यकर्ते व विविध संस्था तसेच संघटनांनी संयुक्तपणे दारूबंदीची मागणी केली. याच कारणांनी सहा वर्षांपूर्वी चंद्रपूर जिह्यात दारूबंदी लागू झाली," असं त्या पत्रात नमूद केलं आहे."पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने महसुलासाठी व एका मंत्र्याचा हट्ट पुरविण्यासाठीच दारूबंदी रद्द केली. ही बाब अयोग्य असून लाखो महिलांचा संसार उद्ध्वस्त करणारी असल्याचे पत्रकात नमूद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी व्हावी यासाठी आंदोलन झाले‌. पदयात्रा काढण्यात आल्या. चर्चासत्र झाले. त्या सर्व आंदोलनाचा व लोकभावनांचा हा अपमान आहे. सरकार दारूबंदीच्या अंमलबजावणीत असफल ठरले आहे. त्या अपयशाची परिणती बंदी उठविण्यात आली. त्याबाबत फेरविचार करावा," अशी मागणीही पत्रातून महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवचरण ठाकूर, मंत्री मधुकर शिरसाट, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुंडे, प्रवक्ता रमेश दाणे यांनी पत्राद्वारे केली आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदीMaharashtraमहाराष्ट्रChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरे