शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

"दारूबंदी मागे घेण्याचा निर्णय निराशाजनक; मंत्र्याच्या हट्टामुळे दारूबंदी रद्द"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 18:14 IST

महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे मुख्यमंत्र्यांना पत्रयापूर्वी चंद्रपुरातली दारूबंदी घेण्यात आली होती मागे

सेवाग्राम (वर्धा) : महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी मागे घेतली आहे. हा निर्णय निराशाजनक असल्याच्या आशयाचे पत्र महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी पाठविले आहे."दारूबंदीमुळे गुन्हेगारी व अवैध दारूची विक्री वाढते असा जावई शोध चंद्रपूरचे पालकमंत्री यांनी लावला आहे. त्याच पद्धतीचा अहवाल तथाकथित समितीकडून करून आणला. या निर्णयाच्या संदर्भात फेरविचार करावा. चंद्रपूर जिल्ह्यातील एक लाख महिलांनी दारूबंदीसाठी आंदोलन केले होते. ५८८ ग्रामपंचायतींनी तसे ठराव मंजूरही केले आहेत. जिल्हा परिषदेने एकमताने दारूबंदीसाठी ठराव केला. जिल्ह्यातील विचारवंत व विधायक कार्यकर्ते व विविध संस्था तसेच संघटनांनी संयुक्तपणे दारूबंदीची मागणी केली. याच कारणांनी सहा वर्षांपूर्वी चंद्रपूर जिह्यात दारूबंदी लागू झाली," असं त्या पत्रात नमूद केलं आहे."पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने महसुलासाठी व एका मंत्र्याचा हट्ट पुरविण्यासाठीच दारूबंदी रद्द केली. ही बाब अयोग्य असून लाखो महिलांचा संसार उद्ध्वस्त करणारी असल्याचे पत्रकात नमूद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी व्हावी यासाठी आंदोलन झाले‌. पदयात्रा काढण्यात आल्या. चर्चासत्र झाले. त्या सर्व आंदोलनाचा व लोकभावनांचा हा अपमान आहे. सरकार दारूबंदीच्या अंमलबजावणीत असफल ठरले आहे. त्या अपयशाची परिणती बंदी उठविण्यात आली. त्याबाबत फेरविचार करावा," अशी मागणीही पत्रातून महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवचरण ठाकूर, मंत्री मधुकर शिरसाट, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुंडे, प्रवक्ता रमेश दाणे यांनी पत्राद्वारे केली आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदीMaharashtraमहाराष्ट्रChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरे