शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

चंद्रपूर जिल्हा अ‌वैध धंद्यासाठी ‌‘सेफ झाेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:26 AM

चंद्रपूर : गेल्या काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर झालेल्या अफलातून कारवायातून चंद्रपूर जिल्हा अवैध धंद्यासाठी ‘सेफ झोन’ असल्याचेच ...

चंद्रपूर : गेल्या काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर झालेल्या अफलातून कारवायातून चंद्रपूर जिल्हा अवैध धंद्यासाठी ‘सेफ झोन’ असल्याचेच दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसातील कारवायांवर दृष्टी फिरविल्यास चंद्रपूरची वाटचाल कोणत्या दिशेने चालली ही बाब लक्षात येणारी आहे. हे सर्वकाही वरूनच मॅनेज झाल्यामुळे सुरू असल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते यावर कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

गेल्या आठवड्यात ‘लोकमत’ने अवैधरीत्या नदीघाटातून सुरू असलेल्या वाळू तस्करीकडे वृत्तातून लक्ष वेधले होते. यानंतर महसूल विभाग खडबडून जागा झाला. येथील उपविभागीय अधिकारी रोहन घुगे यांनी भल्या पहाटे घुग्घुस परिसरातील वर्धा नदीच्या घाटावर धाड घातली. एक दोन नव्हे रेती तस्करी करणारे तब्बल २४ ट्रॅक्टर पकडले. यावरून चंद्रपूर जिल्ह्यात दररोज रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असेल याचा अंदाज येतो. मात्र स्वत:हून कारवाईस प्रशासन धजावत नाही, ही वस्तुस्थिती यानिमित्ताने पुढे आली आहे.

दरम्यानच्या काळात ‌‌‘लोकमत’ने ‘विशिष्ट साखळीच्या माध्यमातूनच जिल्ह्यात वाहते अवैध दारूचे पाट’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करून वास्तव जनतेपुढे आणले होते. मंगळवारी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूरकडून आलेली दारूची सहा वाहने पकडल्याने या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले. यामध्ये तब्बल ७९ लाखाचा दारूसाठा आढळला. एकीकडे ही कारवाई सुरू असताना त्याच रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील गंजवाॅर्ड परिसरातील एका फ्लॅटमधून ३२ लाखाचा सुगंधित तंबाखू जप्त केला. जिल्ह्यात विविध भागात कोंबड्याच्या एका झुंजीवर लाखोचा जुगार खेळला जात आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. हे सर्व खुलेआम सुरू आहे. कुणाचाही वचक दिसत नाही.

उपरोक्त तीनही कारयावा संबंधित विभागाकडून होणे अपेक्षित होत्या. राजकीय पक्षाचे पदाधिकारी वा स्वत: लोकप्रतिनिधींना रस्त्यावर उतरून कराव्या लागत आहे. याचा अर्थ काय समजावा, असा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला पडला आहे. याचे उत्तर गृहमंत्री देतील, अशी आशा चंद्रपूरची जनता बाळगून आहे.