शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

‘कडू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी...’; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 09:48 IST

चंद्रपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर घणाघात; मराठीमध्ये केली भाषणाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : “माता महाकाली यांच्या पावनभूमीत शक्तीला नमन करून चंद्रपूरकरांना माझा नमस्कार,” अशा शब्दांत मराठीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. उद्यापासून गुढीपाडवा नवे पर्व सुरू होत आहे. सगळ्या बंधू-भगिनींना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, अशा मराठीत शुभेच्छा देतानाच भाषणाच्या ओघात  ‘कडू कारले, तुपात तळले, सारखेत घाेळले तरी कडू ते कडूच’ अशी म्हण वापरून काँग्रेसवाले कधी सुधारणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी प्रहार केला. 

काश्मीरमधील अशांततेबद्दल बाळासाहेब ठाकरे काँग्रेसवर सडकून टीका करायचे. ते देश जाेडणाऱ्या शक्तींसाेबत सदैव राहिले; पण, नकली शिवसेनेवाले काँग्रेसच्या मदतीने देश ताेडण्याची भाषा करणाऱ्या लोकांसोबत तसेच सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया म्हणणाऱ्यांसोबत मुंबईत रॅली करतात, अशी उद्धवसेनेवर सडकून टीका मोदींनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आम्ही वेगाने काम करतो आहोत. नियत चांगली असली की निकालही चांगलेच येतात, असे ते म्हणाले. 

पंतप्रधान मोदींच्या भाषणातून....nगडचिराेली पोलाद कॅपिटल : आमच्या कार्यकाळात देशाला विकासाच्या मार्गावर नेले, गडचिराेलीतील नक्षलवाद कमजाेर केला, आता गडचिराेली ही देशाची पोलाद कॅपिटल म्हणून म्हणून ओळखली जाईल. त्यामुळे देशात केवळ एकच गॅरंटी चालते ती म्हणजे माेदींची गॅरंटी.nमाेदींनी नाही, एका मताने बदलले भविष्य : भाजप एनडीए सरकारने माेठे निर्णय घेतले, विकास गतिमान केला. दलित, आदिवासी आणि मागास कुटुंबांचे आयुष्य बदलण्यासाठी काम करून दाखवले. चार कोटी लोकांना घरे मिळवून दिली. हे काेणी केले, हे काेणी केले? माेदींनी नाही केले, हे फक्त तुमच्या एका मताने केले, त्या एका मतामुळे माेंदीना ताकद मिळाली, मी कुठल्याही शाही घराण्यातून आलेलो नाही. तुम्हीच मला इथवर आणले आहे.nचंद्रपूरचे सागवान राममंदिर व संसदेत : चंद्रपूरकरांचा स्नेह मला अधिक भावला आहे. चंद्रपूरच्या जंगलातील सागवान हे अयाेध्येच्या राम मंदिरात व नव्या भारताची ओळख असलेल्या संसदेत लागलेले आहे. त्यामुळे चंद्रपूरची ओळख देशभरात झाली आहे. 

माेदींच्या हातात संविधान मजबूत : आठवले

माेंदीच्या हातात संविधान मजबूत असून, गाेरगरीब जनतेचे भले करण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यामुळे संविधान धाेक्यात आहे, अशी अफवा पसरविणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.यावेळी आठवले यांनी आपल्या खास आणि चिरपरिचित शैलीत काही रचना ऐकवल्या. त्या अशा...जे कधीच राहिले नाही कुणाचे मिंधे,या ठिकाणी आले आहेतएकनाथ शिंदे!महाराष्ट्रातील महायुती मजबुतीसाठीदेवेंद्र फडणवीस यांचा आहे वाटा,कारण त्यांनी काढला आहेशरद पवार, उद्धव ठाकरेंचा काटा! ..................ज्या वेळी मी चंद्रपुरात येताे माझ्या आठवणीत येते चंद्रयानसाऱ्या जगाचे असते भारताकडे ध्यान,या देशाची १४० काेटी जनता आहेनरेंद्र माेदीजींची फॅनया निवडणुकीत आम्ही लावणार आहेइंडिया आघाडीवर बॅन!..................आम्ही करणार आहाेत चारशे पार,मग का हाेणार नाही काँग्रेसची हार?

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूर