शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख ८८ हजार ४२ कुटुंबांना ‘आयुष्मान’चे आरोग्यकवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

२०११ च्या जनगणनेमधील नोंदीनुसार आयुष्यमान भारत योजनेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील सुमारे २ लाख ७ हजार लाभार्थी निवडण्यात आले आहेत. कार्ड केवायसी प्रक्रिया पूर्ण करून कार्ड वितरणाची विशेष मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक माध्यमिक शाळा, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आशा, अंगणवाडीसेविका मदतनीस यांच्या माध्यमातून आयुष्यमान भारत योजना योजनेची जनजागृती करून लाभार्थ्यांशी संपर्क साधण्यात आला.

ठळक मुद्देगोल्डन कार्ड वितरण : ६ हजार ९४१ रूग्णांवर मोफत उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी २३ सप्टेंबर २०१८ पासून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरू केली. या योजनेतंर्गत जिल्ह्यात १ लाख ८८ हजार ४२ कुटुंबांना गोल्डन कार्ड वितरण करून आरोग्यकवच देण्यात आले. आरोग्य विभागाकडून योग्य पाठपुरावा सुरू असून लवकरच इष्टांक पूर्ण होणार आहे. जानेवारी २०२० पर्यंत ६ हजार ९४१ रूग्णांना विमा लाभ मिळाला आहे.२०११ च्या जनगणनेमधील नोंदीनुसार आयुष्यमान भारत योजनेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील सुमारे २ लाख ७ हजार लाभार्थी निवडण्यात आले आहेत. कार्ड केवायसी प्रक्रिया पूर्ण करून कार्ड वितरणाची विशेष मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक माध्यमिक शाळा, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आशा, अंगणवाडीसेविका मदतनीस यांच्या माध्यमातून आयुष्यमान भारत योजना योजनेची जनजागृती करून लाभार्थ्यांशी संपर्क साधण्यात आला. २०११ ला झालेल्या जनगणनेतील सर्वेक्षणातील कुटुंबांना सदर योजनेतंर्गत ५ लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा दिल्या जाते. याकरिता केंद्र शासन ६० टक्के तर राज्य शासनाकडून ४० टक्के आर्थिक वाटा उचलतो. योजनेतंर्गत गरीबांना खासगी रूग्णालयातही चांगले उपचार मिळतील. यामध्ये कर्करोग, हृदयाचे आजार, मुत्रपिंड व लिव्हरचे आजार, मधुमेह आदी आजारांसह १ हजार ३०० आजारांचा समावेश आहे. लाभार्थीच्या कुटुंबासाठी सुमारे १ ते दीड लाखांपर्यंत आरोग्य विम्याचीही तरतूद करण्यात आली. त्यावरील आरोग्यसेवेची गरज पडल्यास त्याचा खर्च थेट राज्य सरकारमार्फत करण्यात येईल, असा विचारही सध्या सरकारकडून केला जात आहे. विमा कंपन्यांसोबत संपूर्ण रकमेचा म्हणजेच ५ लाखांचा विमा करार केल्यास हप्त्याची रक्कम वाढेल, त्यामुळे अतिरिक्त हप्त्याचा विचार करून हा सुवर्णमध्ये काढण्यात आला आहे. ही योजना सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने जिल्ह्याला दिलेले लक्ष्यांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य विभागाने प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केली आहे.११ कुटुंब प्रकारांना मिळतो लाभआयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत शहरी भागातील ११ कुटुंब प्रकारांचा समावेश आहे. यामध्ये कचरावेचक, बांधकाम मजूर, घरकाम, फेरीवाले, भिकारी आदी कुटुंबानांही लाभ दिला जातो. ग्रामीण भागात घरांची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमावत्या व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी आदी कुटुंबांची निवड केली जाते.जिल्ह्यातील १५ तालुक्यातील गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, अंगणवाडी प्रकल्प अधिकारी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आशा, अंगणवाडीसेविका मदतनीस यांच्या माध्यमातून आयुष्मान भारत योजनेची जनजागृती सुरू आहे. पात्र कुटुंबांची केवायसी नोंदविण्याकडे विशेष लक्ष दिले जात असून गरजु कुटुंबांतील व्यक्तींसाठी ही योजना नवसंजीवनी ठरली आहे.- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारत