पावसापासून वाचण्यासाठी ते चहाच्या टपरीवर थांबले आणि अघटित घडले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 11:44 AM2020-07-14T11:44:16+5:302020-07-14T11:46:10+5:30

सावरगाव, वलनी परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. वलनी हद्दीतील कोजबी फाट्याजवळील वडाच्या झाडाखाली असलेल्या चहा टपरीच्या झोपडीत काही जण पावसापासून बचावासाठी उभे होते. दरम्यान...

To avoid the rain, they stopped at a tea stall and accidentally ... | पावसापासून वाचण्यासाठी ते चहाच्या टपरीवर थांबले आणि अघटित घडले...

पावसापासून वाचण्यासाठी ते चहाच्या टपरीवर थांबले आणि अघटित घडले...

Next
ठळक मुद्देवीज पडून १२ वर्षीय मुलासह दोघांचा मृत्यूतिघे जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील वलनी येथील कोजबी फाट्यावर असलेल्या वडाच्या झाडाखालील चहा टपरीच्या झोपडीत पावसापासून बचाव करीत थांबले असताना अचानक वीज कोसळली. यात दोघांचा मृत्यू झाला तर तीन जख जखमी झाले आहेत. मृतकामध्ये एका १२ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
अशोक कोंडुजी तिरमारे (४५) रा. वलनी व लोकचंद रामू पोहनकर (१२) रा. सोनुली ता. नागभीड अशी मृतकांची नावे आहेत. याशिवाय सुनील श्यामराव बोरकर (३०) रा. गिरगाव, मोरेश्वर दयाराम मडावी रा. वलनी, गोपीचंद वासेकर रा. वलनी हे जखमी असून त्यांना नागभीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सावरगाव, वलनी परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. दरम्यान वलनी हद्दीतील कोजबी फाट्याजवळील वडाच्या झाडाखाली असलेल्या चहा टपरीच्या झोपडीत अशोक तिरमारे, लोकचंद पोहनकर व अन्य काही जण पावसापासून बचावासाठी उभे होते. दरम्यान, वीज सरळ झोपडीवरच कोसळली. यात अशोक तिरमारे व लोकचंदचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघे जखमी झाले.

Web Title: To avoid the rain, they stopped at a tea stall and accidentally ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.