शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

अन्नपाण्याविना आंदोलक चिमणीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:00 IST

बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीदेखील प्रकल्पग्रस्तांना समजावून सांगण्याचा कसोशीने प्रयत्न केला आणि प्रश्न मार्गी लावायचा असेल तर आंदोलकांनी आपल्या न्याय मागण्या मांडाव्या आणि शासनाला सहकार्य करावे अशी भूमिका मांडली. विशेष म्हणजे, चंद्रपूरच्या दोन्ही आमदारांनी आणि खासदारांनी प्रकल्पग्रस्त प्रतिनिधींना वारंवार विनंती केली की आंदोलकांना शासनाला सहकार्य करून आपल्या न्याय मागण्या मांडाव्या.

ठळक मुद्देप्रशासन ताठर : कुणालाही चिमणीवर चढण्यास मज्जाव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबतची बैठक शुक्रवारी निष्फळ ठरल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन आणखी तीव्र केले आहे. त्यांनी चिमणीवर राहत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे प्रशासनही कठोर झाले आहे. चिमणीवर चढून असलेल्या प्रकल्पग्रस्तांचे अन्नपाणी बंद करून वीज पुरवठाही खंडीत केला आहे. अन्य कोणलाही चिमणीवर चढण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अन्नपाण्याविना आंदोलकांची प्रकृती ढासळत चालली आहे.चंद्रपूर येथील महाऔष्णिक वीज केंद्रासाठी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र त्यावेळी ठरल्याप्रमाणे एकाला नोकरी व रोख मोबदला देण्यात आला नाही. त्यामुळे ५ आॅगस्टपासून आठ प्रकल्पग्रस्तांनी वीज केंद्राच्या एका चिमणीवर चढून आंदोलन सुरू केले. दरम्यान या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन उजार्मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शुक्रवारी नागपुरात तातडीने प्रकल्पग्रस्तांची बैठक बोलावली व त्यात चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार सुरेश धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी सहभागी झाले होते. मात्र, प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी न्याय मिळेपर्यंत चिमणी खाली उतरणार नाही असे अडवणुकीचे धोरण स्वीकारले, त्यामुळे बैठक यशस्वी होऊ शकली नाही.बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीदेखील प्रकल्पग्रस्तांना समजावून सांगण्याचा कसोशीने प्रयत्न केला आणि प्रश्न मार्गी लावायचा असेल तर आंदोलकांनी आपल्या न्याय मागण्या मांडाव्या आणि शासनाला सहकार्य करावे अशी भूमिका मांडली. विशेष म्हणजे, चंद्रपूरच्या दोन्ही आमदारांनी आणि खासदारांनी प्रकल्पग्रस्त प्रतिनिधींना वारंवार विनंती केली की आंदोलकांना शासनाला सहकार्य करून आपल्या न्याय मागण्या मांडाव्या. मात्र, प्रकल्पग्रस्त प्रतिनिधींनी आमदार, खासदार आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या विनंतीला असहमती दर्शवली. स्वत: उजार्मंत्री सायंकाळपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या निर्णयाची वाट बघत होते. परंतु प्रकल्पग्रस्त आपल्या निर्णयावर ठाम अडून बसले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांकडून प्रशासनाला ब्लॅकमेल केले जात आहे. असा समज आता प्रशासनाचा झाला आहे. दरम्यान शनिवारी आंदोलनकर्त्यांना अन्न व पाणी पोहचू देण्यास चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे प्रशासन व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी मज्जाव केला. प्रकल्पग्रस्तांना जेवण, पाणी हवे असेल तर त्यांनी खाली यावे व जेवण करावे, असे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना सांगितले आहे. रविवारीदेखील प्रकल्पग्रस्त चिमणीवरच होते. अन्नपाण्याविना त्यांची प्रकृती आता ढासळत चालली आहे.‘हिराई’वर पार पडली तातडीची बैठकप्रकल्पग्रस्तांचे सुरू असलेले आंदोलन व त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी रविवारी पुन्हा चंद्रपूर वीज केंद्राच्या हिराई या विश्रामगृहात तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे, हे प्रकरण हाताळण्यासाठी खास नियुक्त केलेले नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, दुर्गापूरचे ठाणेदार, प्रकल्पग्रस्तांचे नेते उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत कोणता निर्णय घेण्यात आला हे मात्र कळू शकले नाही. विशेष म्हणजे, सात प्रकल्पग्रस्त चिमणीवर असताना चिमणीखाली २२ प्रकल्पग्रस्त दररोज उपस्थित राहत होते. ते आंदोलन करणाºया प्रकल्पग्रस्तांवर नजर ठेवून होते. शुक्रवारपर्यंत तेच आंदोलकांना चिमणीवर चढून जेवण व पाणी देत होते. मात्र रविवारी केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी चिमणीखाली असलेल्या २२ प्रकल्पग्रस्तांना आपल्या वाहनात बसवून अन्य ठिकाणी नेत चिमणीखालचा परिसर मोकळा केला आहे.चिमणीवरील आंदोलक अजूनही तिथेच आहेत. त्यांना वारंवार चिमणीवरून खाली उतरण्याची व समस्यांवर चर्चा करण्यासाठी विनंती केली जात आहे. चिमणीखाली असलेल्या २२ प्रकल्पग्रस्तांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खबरदारी म्हणून तिथून हलविण्यात आले आहे.-राजू घुगे,मुख्य अभियंता, चंद्रपूर वीज केंद्र.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNitin Rautनितीन राऊत