शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

२८ वर्षांनंतरही विद्यार्थिनी भत्ता केवळ एक रुपया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदांच्या शाळेत शिकणारी गरिबांची मुले आहेत. मुलींना शिक्षण मिळावे हा उद्देश महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी ठेवला आहे. परंतु २८ वर्षांत एकाही शिक्षक संघटनेने गरीब कुटुंबातील मुलींच्या उपस्थिती भत्त्याबाबत आवाज उठवला नाही, हे आश्चर्य म्हणावे लागेल. त्यांनीही याकडे आजवर विशेष लक्ष दिले नाही.

ठळक मुद्देसावित्रीच्या लेकींची बोळवण : योजना चांगली; मात्र सुधारणा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गरीब विद्यार्थिनींच्या उपस्थिती भत्त्याकडे राज्य सरकार व शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे. २८ वर्षांपासून त्यांना केवळ एक रुपयाच उपस्थिती भत्ता मिळत असून यात एका नव्या पैशाचीसुद्धा वाढ करण्यात आली नाही. ही सावित्रीच्या लेकींची थट्टा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती सर्वत्र साजरी झाली. मात्र सावित्रीच्या लेकींची अद्यापही बोळवणच केली जात आहे.शासनाने ३ जानेवारी १९९२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी उपस्थिती भत्ता योजना सुरू केली. या निर्णयानुसार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी म्हणून पहिली ते चौथीमधील जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषदांमार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळेतील आदिवासी उपयोजना क्षेत्राव्यतिरिक्त राज्याच्या अन्य भागातील अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती आणि विमुक्त जमातीतील विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता देण्यात येतो. पूर्वी ग्रामीण भागात मुलींच्या शाळेतील उपस्थितीचे प्रमाण फार कमी होते. त्यातच पालकांचाही मुलींना शिकविण्याकडे कल कमी होता.या सर्व बाबींचा विचार करून शासनाने मुलींची शाळेतील उपस्थिती वाढावी, यासाठी सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी उपस्थिती भत्ता योजना सुरू करण्यात आली. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थितीची अट लागू करण्यात आली. शैक्षणिक वर्षासाठी दर दिवसाला एक रुपयाप्रमाणे २२० रुपये उपस्थिती भत्ता दिला जातो. हा शासन निर्णय होऊन जवळपास २८ वर्षे होऊन गेली. सगळीकडे महागाई वाढली. त्यामुळे अनेक योजनेतील लाभार्थी अनुदान वाढले. मात्र गरीब विद्यार्थिनींच्या उपस्थिती भत्त्यात वाढ झालेली नाही. राज्यात सगळीकडे अशीच परिस्थिती आहे.शिक्षक संघटनांचेही दुर्लक्षजिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदांच्या शाळेत शिकणारी गरिबांची मुले आहेत. मुलींना शिक्षण मिळावे हा उद्देश महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी ठेवला आहे. परंतु २८ वर्षांत एकाही शिक्षक संघटनेने गरीब कुटुंबातील मुलींच्या उपस्थिती भत्त्याबाबत आवाज उठवला नाही, हे आश्चर्य म्हणावे लागेल. त्यांनीही याकडे आजवर विशेष लक्ष दिले नाही.ग्रामीण भागातील मुली शाळेत याव्यात. त्या शिक्षणाच्या प्रवाहात टिकून रहाव्या, याकरिता शासन मुलींना उपस्थिती भत्ता म्हणून मागील अनेक वर्षांपासून एक रुपया प्रतिदिन देत आहे. हा भत्ता तुलनात्मक विचार करता नगण्य आहे. पुरोगामी महाराष्ट्रात सावित्रीमाईच्या राज्यात ही सावित्रीच्या लेकींची हेळसांड आहे. शिक्षक भारतीने वेळोवेळी उपस्थिती भत्ता वाढविण्याची मागणी केली आहे. पुढील महिण्यात होणाऱ्या शिक्षक भारतीच्या राज्यस्तरीय अधिवेशनात हा भत्ता वाढवून १० रुपये करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात येणार आहे.-सुरेश डांगे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी