शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

२८ वर्षांनंतरही विद्यार्थिनी भत्ता केवळ एक रुपया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदांच्या शाळेत शिकणारी गरिबांची मुले आहेत. मुलींना शिक्षण मिळावे हा उद्देश महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी ठेवला आहे. परंतु २८ वर्षांत एकाही शिक्षक संघटनेने गरीब कुटुंबातील मुलींच्या उपस्थिती भत्त्याबाबत आवाज उठवला नाही, हे आश्चर्य म्हणावे लागेल. त्यांनीही याकडे आजवर विशेष लक्ष दिले नाही.

ठळक मुद्देसावित्रीच्या लेकींची बोळवण : योजना चांगली; मात्र सुधारणा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गरीब विद्यार्थिनींच्या उपस्थिती भत्त्याकडे राज्य सरकार व शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे. २८ वर्षांपासून त्यांना केवळ एक रुपयाच उपस्थिती भत्ता मिळत असून यात एका नव्या पैशाचीसुद्धा वाढ करण्यात आली नाही. ही सावित्रीच्या लेकींची थट्टा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती सर्वत्र साजरी झाली. मात्र सावित्रीच्या लेकींची अद्यापही बोळवणच केली जात आहे.शासनाने ३ जानेवारी १९९२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी उपस्थिती भत्ता योजना सुरू केली. या निर्णयानुसार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी म्हणून पहिली ते चौथीमधील जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषदांमार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळेतील आदिवासी उपयोजना क्षेत्राव्यतिरिक्त राज्याच्या अन्य भागातील अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती आणि विमुक्त जमातीतील विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता देण्यात येतो. पूर्वी ग्रामीण भागात मुलींच्या शाळेतील उपस्थितीचे प्रमाण फार कमी होते. त्यातच पालकांचाही मुलींना शिकविण्याकडे कल कमी होता.या सर्व बाबींचा विचार करून शासनाने मुलींची शाळेतील उपस्थिती वाढावी, यासाठी सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी उपस्थिती भत्ता योजना सुरू करण्यात आली. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थितीची अट लागू करण्यात आली. शैक्षणिक वर्षासाठी दर दिवसाला एक रुपयाप्रमाणे २२० रुपये उपस्थिती भत्ता दिला जातो. हा शासन निर्णय होऊन जवळपास २८ वर्षे होऊन गेली. सगळीकडे महागाई वाढली. त्यामुळे अनेक योजनेतील लाभार्थी अनुदान वाढले. मात्र गरीब विद्यार्थिनींच्या उपस्थिती भत्त्यात वाढ झालेली नाही. राज्यात सगळीकडे अशीच परिस्थिती आहे.शिक्षक संघटनांचेही दुर्लक्षजिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदांच्या शाळेत शिकणारी गरिबांची मुले आहेत. मुलींना शिक्षण मिळावे हा उद्देश महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी ठेवला आहे. परंतु २८ वर्षांत एकाही शिक्षक संघटनेने गरीब कुटुंबातील मुलींच्या उपस्थिती भत्त्याबाबत आवाज उठवला नाही, हे आश्चर्य म्हणावे लागेल. त्यांनीही याकडे आजवर विशेष लक्ष दिले नाही.ग्रामीण भागातील मुली शाळेत याव्यात. त्या शिक्षणाच्या प्रवाहात टिकून रहाव्या, याकरिता शासन मुलींना उपस्थिती भत्ता म्हणून मागील अनेक वर्षांपासून एक रुपया प्रतिदिन देत आहे. हा भत्ता तुलनात्मक विचार करता नगण्य आहे. पुरोगामी महाराष्ट्रात सावित्रीमाईच्या राज्यात ही सावित्रीच्या लेकींची हेळसांड आहे. शिक्षक भारतीने वेळोवेळी उपस्थिती भत्ता वाढविण्याची मागणी केली आहे. पुढील महिण्यात होणाऱ्या शिक्षक भारतीच्या राज्यस्तरीय अधिवेशनात हा भत्ता वाढवून १० रुपये करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात येणार आहे.-सुरेश डांगे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी