शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आबीद अलीकडून आदिवासी महिलांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:24 IST

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा येथील आदिवासी व दारिद्र्य रेषेखालील एकता बचत गटाच्या महिलांना ...

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा येथील आदिवासी व दारिद्र्य रेषेखालील एकता बचत गटाच्या महिलांना शासकीय योजनेच्या नावाखाली लाखो रुपयांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. एकूण नऊ महिलांनी सय्यद आबीद अली यांच्याविरुद्ध गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मौजा नांदा येथील महिलांनी १७ जुलै २००२ रोजी एकता महिला बचत गट नांदा या नावाने बचत गट स्थापन केला. आदिवासी व दारिद्र्य रेषेखालील महिलांचा बचत गट असल्याने शासकीय योजनेतून बचत गटाला झेरॉक्स मशीन व एस.टी.डी., पी.सी.ओ. करिता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून १ लाख ५५ हजार रुपयांचे कर्ज मिळाले. मात्र हा व्यवसाय चालला नाही. त्यानंतर सय्यद आबीद अली यांनी गटातील महिलांशी चर्चा केली व कोरपना व्यवसाय टाकून होणाऱ्या कमाईतून बचत गटाच्या कर्जाची परतफेड बँकेला करतो, असे सांगत सर्व साहित्य नेल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. मात्र त्यांनी कर्ज परतफेड केली नाही. बँकेकडून गटाला वारंवार पैसे भरा असे सांगण्यात आल्याने बचत गटातील महिला त्रस्त झाल्या आहेत. बचतगटातील एखाद्या महिलेने मानसिक तणावाखाली स्वत:चे जीवन संपविल्यास यासाठी सय्यद आबीद अली जबाबदार राहतील, असे बचत गटाच्या सचिव ज्योती गजानन उईके, मुन्नी खलील शेख, पुष्पा नथ्थू मडावी, दुर्गा मारोती उईके, पंचफुला वासुदेव मडावी, सीताबाई रामा उदे, पार्वता कर्णु पेंदोर, मंदा नामदेव तोडासे, ललिता मारुती पेंदोर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

कोट

आदिवासी महिलांनी गडचांदूर पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे. प्रकरण चौकशीत ठेवले असून संपूर्ण प्रकरणाची तपासणी झाल्यानंतरच प्रतिक्रिया देता येईल.

- गोपाल भारती ठाणेदार, पो.स्टे., गडचांदूर.

२५ नोव्हेंबर २०२० रोजी १ लाख ६३ हजार ३४३ रुपये व्याजासह भरण्याची नोटीस बॅंकेने आमच्या बचत गटाला पाठविली. बँकेची नोटीस आल्याने आम्ही २१ डिसेंबर २०२० रोजी कोरपना येथे आबीद अली यांचे घर गाठले. त्या वेळेस सय्यद आबिद अली घरी नव्हते. फोनवर बोलून त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. येतो म्हणून सांगितल्यानंतरही घरी आले नाही आणि फोन बंद केला.

- ज्योती उईके, सचिव एकता महिला बचत गट, नांदा