शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
5
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
6
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
7
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
8
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
9
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
10
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
11
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
12
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
13
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
14
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
15
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
16
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
17
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
18
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
19
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
20
Shirish Valsangkar: वळसंगकर रुग्णालयासह 'त्या' चारही डॉक्टरांची बँक खाती तपासा, मनीषा मानेचं पोलिसांना पत्र

लोकसहभागातून ५४४ कामे झाली पूर्ण

By admin | Updated: September 3, 2016 00:39 IST

जलयुक्त शिवार अभियान गेल्या दोन वर्षात संपुर्ण राज्यात लोकचळवळ म्हणून उभी राहिली आहे.

जलयुक्त शिवार : लोकसहभागातून काढला ४.४६ लक्ष घनमीटर गाळचंद्रपूर : जलयुक्त शिवार अभियान गेल्या दोन वर्षात संपुर्ण राज्यात लोकचळवळ म्हणून उभी राहिली आहे. समाजातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांचा या अभियानात सक्रीय सहभाग लाभत आहे. जिल्ह्यातही अभियानास चांगला प्रतिसाद लाभत असून त्यामुळेच केवळ एका वर्षात लोकसहभागातून तब्बल ४ लक्ष ४६ हजार घनमिटर इतका गाळ तलाव, बंधारे, शेततळ्यातून काढण्यात आला आहे.जनकल्याणकारी कुठलेही अभियान किंवा योजना ही लोकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. लोकांना सदर अभियान आपले वाटले तरच ते यशस्वी होते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात शासनाने लोकसहभागावर भर दिला आहे. लोकांचा सहभाग लाभलेल्या योजना यशस्वी झाल्याची अलिकडच्या काळातील अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच जलयुक्त शिवार अभियान राबविताना लोकसहभागावर भर देण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात करोडो रुपए किंमतीची हजारो कामे अभियानांतर्गत लोकसहभागातून झाली आहे. या चळवळीत जिल्ह्यानेही आपला भरीव लोकसहभागाचा वाटा दिला आहे.पहिल्या वषार्साठी जिल्ह्यातील २१८ गावे अभियानासाठी निवडण्यात आली होती. या गावांमध्ये ठिकठिकाणी काही कामे लोकसहभागातून करण्यात आली. लोकसहभागातून करण्यात आलेल्या या कामांची संख्या तब्बल ५४४ इतकी आहे. विशेष म्हणजे या कामातून ४ लक्ष ४६ हजार घनमिटर इतका गाळ तलाव, बंधारे, नाले, शेततळे यातून काढण्यात आला आहे. तलाव, नाला, बंधाऱ्यात गाळ साचल्याने, त्यात पाणीसाठा अल्प प्रमाणात होतो. पाणी संचय क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढणे फार महत्वाचे असते. त्यामुळे या कामासाठी लोकसहभाग घेतल्याने ही कामे होऊ शकली. लोकसहभागातून केलेल्या या कामांवर अत्यावश्यक बाबीसाठी शासनाच्यावतीने दोन कोटी रुपए खर्च करण्यात आले आहे. खाजगी किंवा शासन नियंत्रणातील कंपन्यांना आपल्या सामाजिक दायित्वांतर्गत उत्पन्नातील काही रक्कम लोकहितोपयोगी कामांवर खर्च करावी लागते. त्याअंतर्गत जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या सामाजिक निधीतून जलयुक्त शिवार अभियानाची १९ कामे पूर्ण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या निधीतून १ लक्ष ८४ हजार घनमिटर गाळ काढण्यात आला असून सामाजिक दायित्व निधीतून २४ लक्ष खर्च झाले. (स्थानिक प्रतिनिधी)