शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात २० टक्के जागा राखीव ठेवाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:01 IST

१६ मे १९८४ च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृहात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थी व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २० टक्के जागा राखीव होत्या. या जागांमधून बहुतांश इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत होता. ३० जुलै २०१४ च्या परिपत्रकानुसार अनुसूचित जाती ८० टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती १० टक्के आणि इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग १० टक्के वसतिगृहात आरक्षण होते.

ठळक मुद्देराष्ट्रीय ओबीसी महासंघ : मागासवर्गीय वसतिगृह तयार होण्यास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागासवर्गीय विभागाने वसतिगृहाची घोषणा केली. मात्र, वसतिगृह तयार होण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात २० टक्के जागा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.१६ मे १९८४ च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृहात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थी व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २० टक्के जागा राखीव होत्या. या जागांमधून बहुतांश इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत होता. ३० जुलै २०१४ च्या परिपत्रकानुसार अनुसूचित जाती ८० टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती १० टक्के आणि इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग १० टक्के वसतिगृहात आरक्षण होते.इतर मागासवर्गीय कल्याण मंत्रालय स्वतंत्र स्थापन झाल्यानंतर २१ डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार समाजकल्याण विभागाच्या सर्व वसतिगृहामध्ये ८० टक्के अनुसूचित जाती चे विद्यार्थी, ३ टक्के अनुसूचित जमातीचे विद्यार्थी, ५ टक्के विमुक्त जाती व भटक्या जमातीचे विद्यार्थी, ५ टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व इतर मागास प्रवर्ग विद्यार्थी, २ टक्के विशेष मागास प्रवर्गाचे विद्यार्थी, ३ टक्के अपंग विद्यार्थी, २ टक्के अनाथ विद्यार्थी, याप्रमाणे वर्गीकरण करण्यात आल्याने इतर मागासवर्गीय विद्यार्थी या वसतिगृहातील प्रवेशापासून वंचित आहेत. शैक्षणिक सत्र सुरू व्हायला वेळ आहे.मात्र, आतापासूनच सरकारने लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात २० टक्के जागा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.वसतिगृहांची क्षमताही वाढवावीशासनाने ३० जानेवारी,२०१९ परिपत्रक काढून स्वतंत्र वसतिगृहाची घोषणा केली. मात्र, नवीन नियुक्त कर्मचारी व इमारती उभारणे अथवा भाड्याने घेण्यास कालावधी लागणार आहे. त्यामुळे ओबीसी विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहण्याचा धोका आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना नवीन वसतिगृहाची सुविधा होईपर्यंत समाजकल्याण विभाग अतंर्गत अस्तित्वात असलेले वसतिगृह व इमारतींची क्षमता वाढवून २० टक्के ओबीसी विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्याकरिता इतर मागासवर्गीय कल्याण विभागाने निधी पुरविल्यास इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची सोय होऊन वसतिगृहाची प्रवेशाची समस्या दूर होईल, असेही निवेदनात नमुद केले आहे.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती