शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

तरंगत्या सौर प्रकल्पातून होणार १०५ मेगावॅट वीजनिर्मिती, मुख्य अभियंता कुमारवार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 13:52 IST

सीटीपीएसमध्ये सौर प्रकल्प : प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना

चंद्रपूर : चंद्रपुरातील इरई धरणाच्या पाण्यावर महाजेनकोचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प लवकरच साकार होणार आहे. या प्रकल्पाची रचना तयार करण्यात आली असून, निविदा प्रक्रिया सुरू आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यानंतर १०५ मेगावॅट विजेचे उत्पादन शक्य होणार आहे.

चंद्रपूरवीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश कुमारवार यांनी यासंदर्भात माहिती दिली. चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राची एकूण उत्पादन क्षमता २ हजार ९२० मेगावॅट असून, राज्यातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या एकूण विजेच्या ३० टक्क्यांहून अधिक या वीज केंद्राचा वाटा असल्याचेही कुमारवार म्हणाले. प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

६०० मेगावॅटचा सुपर क्रिटिकल पॉवर युनिट उभारणार

पर्यावरणाच्या समस्यांमुळे या प्लांटचे २ युनिट आधीच बंद पडले आहेत. ३ आणि ४ युनिटचे वयही ३५ वर्षांपेक्षा जास्त झाले आहे. राज्यातील विजेची मागणी लक्षात घेऊन ते सुरू करण्यात येत आहे. आधुनिक उपकरणे त्यामध्ये स्थापित केले जात आहेत जेणेकरून जुन्या युनिट्समधून कोणतेही प्रदूषण होणार नाही. या पॉवरहाऊसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह ६०० मेगावॅट क्षमतेचे सुपर क्रिटिकल पॉवर युनिट उभारण्याचा प्रस्ताव असून, भविष्यात हा प्रकल्पही राबविला जाणार आहे.

राखेबाबत सिमेंट उद्योगांशी करार

या प्लांटमध्ये वीजनिर्मितीसाठी दररोज ४५ हजार मेट्रिक टन कोळशाचा वापर होतो. या कोळशातून सुमारे ३५ टक्के राख निघते. या राखेचा १०० टक्के पुनर्वापर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. सध्या ४५ टक्के राख जमा झाली आहे. ही राख राज्यातील विविध उद्योगांना दिली जात आहे. सिमेंट उद्योगांना या राखेची सर्वाधिक गरज आहे. वीजनिर्मिती केंद्र व्यवस्थापनाने अंबुजा, अल्ट्राटेक आणि एसीसीसारख्या सिमेंट उद्योगांशी करार केला आहे. ही राख भूमिगत कोळसा खाणींमध्येही वापरली जात आहे.

पाणी पुनर्वापरावर भर

सीटीपीएसद्वारे वीजनिर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी हे महाजेनकोच्या इरई धरणातून घेतले जाते. या धरणातून चंद्रपूर शहरालाही पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी सीटीपीएस व्यवस्थापन कमीत कमी पाण्याचा वापर करीत आहे, असे त्यांनी सांगितले. यासाठी पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी महाजेनको आणि महापालिका संयुक्त प्रयत्न करत आहेत.

मलनिस्सारण प्रकल्प अंतिम टप्प्यात

चंद्रपूर शहरातून बाहेर पडणाऱ्या घाण पाण्यावर प्रक्रिया करून ते पॉवर हाऊसमध्ये वापरण्यासाठी आणले जात आहे. त्यासाठी शहरात मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले आहेत. शहरातून सीटीपीएसपर्यंत पाइपलाइन टाकण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. हे काम एक-दोन महिन्यांत पूर्ण होईल. या योजनेंतर्गत सीटीपीएसमधून चंद्रपूर शहराला दररोज ५० एमएलडी पाणी मिळणे अपेक्षित आहे.

टॅग्स :electricityवीजchandrapur-acचंद्रपूर