शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पश्चिम विदर्भात आयटीआयसाठी ३६ टक्के विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:38 IST

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान, कला, वाणिज्य शाखेकडे सर्वाधिक असतो. परंतू गेल्या काही वर्षापासून औद्योगिक क्षेत्रात निर्माण झालेल्या ...

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान, कला, वाणिज्य शाखेकडे सर्वाधिक असतो. परंतू गेल्या काही वर्षापासून औद्योगिक क्षेत्रात निर्माण झालेल्या संधीमुळे विद्यार्थी आयटीआयकडे वळले आहेत. परिणामी जागा कमी आणि अर्ज जास्त येत असल्याचे चित्र दरवर्षी पहावयास मिळते. पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्याचे चित्र बघितले असता, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अर्ज कमी आले आहेत. परंतू आलेले अर्ज हे जागेपेक्षा जास्तच असल्याने यंदाही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागणार आहे.

जागेपेक्षा अर्ज जास्तच

पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात मागील वर्षी ६१ हजार ७६६ अर्ज आयटीआयसाठी आले होते. तर यावर्षी ३९ हजार ५९४ अर्ज आलेले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अर्ज कमी येऊनही उपलब्ध जागेपेक्षा मात्र या अर्जाची संख्या जास्तच आहे.

जिल्हानिहाय आलेले अर्ज

जिल्हा २०२० २०२१

अकोला ११९९५ ७२२३

अमरावती १६४३३ १०६५०

बुलडाणा १२३६३ ८७८०

वाशिम ६०५७ ४०५३

यवतमाळ १४९१८ ८८८८