शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्याचा पाणी टंचाई कृती आराखडा पाच कोटींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 15:08 IST

या आराखड्यात जिल्ह्यातील ४३९ गावांसाठी ५१८ योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

- सोहम घाडगे  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या २२ टक्के जादा पाऊस पडल्याने गतवर्षीच्या तुलनेत टंचाईची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या टंचाई कृती आराखड्यात त्याचे प्रतिबिंब दिसून आले आहे. जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा अवघ्या पाच कोटी रुपयांच्या आसपास आहे. गतवर्षी अवर्षण स्थितीमुळे जिल्ह्यात ४४ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च टंचाई निवारणाच्या कामावर करावा लागला होता.जिल्ह्यात यावर्षी दमदार पाऊस झाल्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध असून परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये तुलनेत कमी पाऊस झाला आहे. परिणामी, या जिल्ह्यातील या भागामध्ये येणाऱ्या काळात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. भविष्यातील पाणीटंचाईचे संकट पाहता सुमारे पाच कोटी रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये जून २०२० पर्यंत उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. या आराखड्यामध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर २०१९, जानेवारी २०२० ते मार्च २०२० आणि एप्रिल २०२० ते जून २०२० असे तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार नवीन विंधन विहिरी तयार करणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती करणे, नवीन नळ योजना करणे, टँकरने पाणीपुरवठा करणे, विहिरींचे अधिग्रहण करून गाळ काढणे आदी कामे सुचविण्यात आली आहेत.या आराखड्यात जिल्ह्यातील ४३९ गावांसाठी ५१८ योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी सुमारे ४ कोटी ७३ लाख ३२ हजार रुपयांची तरतूद केली आहे.जिल्ह्यातील ३५१ गावांमधील ३६० खासगी विहीर अधिग्रहीत करण्यात येणार असून त्याकरिता १ कोटी ४७ लाख ९२ हजार रुपयांचे नियोजन केले आहे. टँकरद्वारे २१ गावांना पाणीपुरवठा करण्याची गरज भासण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून २०२० दरम्यान टँकरची संख्या वाढवावी लागणार असून टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी १ कोटी ११ लाख ४५ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. अनेक गावातील नळयोजना जुनाट झालेल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येचा भार सहन करण्यासाठी त्याठिकाणी नळ योजनेची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील २२ गावांमध्ये नळयोजनेची विशेष दुरुस्तीची कामे कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यासाठी १ कोटी १० लाख रुपयांचे नियोजन केले आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने जून महिन्यांपर्यंत पाणीटंचाई निवारणासाठी तयार करण्यात येणाºया विविध योजनांवरील संभाव्य खर्चाची माहिती शासनाकडे पाठविली आहे.९९ गावांमध्ये ११२ विंधन विहिरीविंधन विहीर जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचा महत्वाचा स्त्रोत आहे. मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येची पाण्याची गरज त्याद्वारे भागविली जाते. दुष्काळात नेहमीच विंधन विहिरींचा आधार राहिला आहे. त्याकरिता दरवर्षी विंधन विहिरी घेणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करण्याची कामे करण्यात येतात. यंदाच्या कृती आराखड्यात ९९ गावांमध्ये ११२ नवीन विंधन विहिरी घेण्यासाठी खर्चाचे नियोजन केले आहे. त्यासाठी ७३ लाख ९५ हजारांचा आराखडा सादर केला आहे.

तीन तात्पुरत्या पुरक नळ योजना तीन गावांमध्ये तात्पुरत्या पुरक नळ योजनेची तरतूद केली आहे. त्यासाठी ३० लाख रुपये खर्चाचे नियोजन केले आहे. दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तात्पुरती पुरक नळ योजनेचे नियोजन प्रशासनाकडून केले जाते. यंदा तीन तात्पुरत्या पुरक नळ योजनांसाठी ३० लाख रुपये खर्चाचे नियोजन केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई