शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शाळेत जाण्यासाठी नदीपात्रातून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 1:09 PM

बुलडाणा : मोताळा तालुक्यातील रिधोरा जहाँगीर येथे बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना पावसाळ्यात १० किमी फेऱ्याने किंवा नदीपात्रातून जीव मुठीत घेवून शाळेत जावे लागते.

ठळक मुद्दे रिधोरा जहाँगीर येथील गावातून नळगंगा नदी वाहते. विद्यार्थ्यांना नदीच्या पात्रातून मार्ग काढीत विंष्ठवा चिंचपूर मार्गे १० कि.मी. फेºयाने शाळेत जावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना दररोज २० ते ३० रुपयांचा खर्च करुन विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मोताळा तालुक्यातील रिधोरा जहाँगीर येथे बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना पावसाळ्यात १० किमी फेऱ्याने किंवा नदीपात्रातून जीव मुठीत घेवून शाळेत जावे लागते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बसफेरी सुरु करण्याची गरज आहे.एकीकडे शासन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करोडो रुपये खर्च करीत आहे. तर दुसरीकडे मोताळा तालुक्यातील रिधोरा जहाँगीर येथील गावातून नळगंगा नदी वाहते. नदीवर पुल नसल्याने विद्यार्थ्यांना नदीच्या पात्रातून मार्ग काढीत विंष्ठवा चिंचपूर मार्गे १० कि.मी. फेºयाने शाळेत जावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परीणाम होत आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना दररोज २० ते ३० रुपयांचा खर्च करुन विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे लागत आहे. या त्रासाची मुक्तता व्हावी व गावातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी मोताळा-रिधोरा चिंचपूर मार्गे सकाळी ९.३० वाजता व सायंकाळी ५ वाजता बस सुरु करण्यात यावी, अशी मागणी विभाग नियंत्रकांकडे करण्यात आली आहे. आमदार हर्षवर्धन सपकाळ व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे. आ. सपकाळ यांनी तत्काळ दखल घेत मोताळा चिंचपूरमार्गे रिधोरा बस सुरु करण्याची विभाग नियंत्रकांकडे मागणी केली.

निवेदनावर ग्रा.पं.सदस्य विनोद मानकर, गौरव सपकाळ, डिगांबर मानकर, शैलेश मानकर, सुरज कोळसे, राजेंद्र मानकर, गोविंदा मानकर, मनोज सपकाळ, गोवर्धन सुरडकर, सिंधूबाई डोबाळे, संगीता डोबाळे, किशोर नवले, दिक्षा सुरडकर, स्वाती सुरडकर, जानराव सुरडकर, सिमा मानकर, संगीता मानकर, संजय मानकर,भारताबाई मानकर, धनराज मानकर, सत्यभामा मानकर यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळाStudentविद्यार्थी