शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

भाजपाने आणली शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ - राधाकृष्ण विखे पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 7:26 PM

अच्छे दिनचे स्वप्न दाखवणा-या भाजपा सरकारने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले आहे. एवढेच नाहीतर देशाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याला न्याय देण्याऐवजी आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा टीका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

वरवटबकाल (ता. संग्रामपूर) : अच्छे दिनचे स्वप्न दाखवणा-या भाजपा सरकारने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले आहे. एवढेच नाहीतर देशाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याला न्याय देण्याऐवजी आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा टीका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा बुलडाणा जिल्ह्यात दाखल शनिवारी दाखल झाली. ही जनसंघर्ष यात्रा दुपारी ४.३० वाजता वरवटबकाल येथे दाखल झाली. यानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुकुलजी वासनिक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खा.अशोक चव्हाण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान सभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे,महाराष्ट सहप्रभारी आशिषजी दुआ,आ.वजाहत मिर्जा,आ.अब्दुल सत्तार,जिल्हा अध्यक्ष आमदार राहुल बोन्द्रे,आ. हर्षवर्धन सपकाळ, (अखिल भारतीय कॉग्रेस सरचिटणीस)प्रदेश सरचिटणीस अॅड, गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस शामभाऊ उमाळकर, मदन भरगड, संजय राठोड, विजय अंभोरे,यांच्यासह राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते तसेच जळगाव जामोद मतदार संघातीलपदाधिकारी सह बुलढाणा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर उपस्थित होते. यापुढे पुढे बोलतांना विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. मोदी सरकारला जनशक्तीची ताकद आपल्या मतदानातून दाखवण्याची वेळ आली आहे. या सरकारने हा देश पोखरून काढला आहे. जलयुक्त शिवार फक्त नावालाच असल्यामुळे या योजनेबाबत कोटी रुपयांची उलाढाल केली. ही रक्कम शेतक-यांच्या घामाची असून शेतक-यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासनही सरकार पूर्ण करू शकले नाही. सरकार भगवान रामाच्या नावाचा राजकारण करीत असून  जातीय आरक्षणाबाबत कुठलाही ठोस निर्णय न घेता त्यावर केवळ राजकारण केल्या जात असल्याचे विखे पाटील म्हणाले. राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे संग्रामपूर तालुक्यात सोनाळा येथे दाखल होताच येथील कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतीषबाजीत स्वागत केले. दरम्यान काटेल येथे संत गुलाब बाबा यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेस