शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पालक आणि मुले यांच्यात मतभेद असावे, पण ‘मनभेद’ नसावे! - राजीव तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 16:44 IST

घरात पालक आणि मुले यांच्यात मतभेद जरूर असावेत, पण मनभेद नसावेत, असे मत मुंबई येथील मराठी बाल साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजीव तांबे यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: मुलांच्या वेगवेगळ्या विचारांचा आदर आपण करायला शिकले पाहिजे. मुलांपर्यंत योग्य साहित्य पोहचविले पाहिजे. मुलांना आपली आवड शोधायला वेळ लागतो. त्यासाठीचा वेध आणि संधी मुलांना उपलब्ध करून द्यावी लागते. म्हणूनच त्यांना त्यांच्या आवडीबदलण्याचं स्वातंत्र्य द्यावं लागतं. घरात पालक आणि मुले यांच्यात मतभेद जरूर असावेत, पण मनभेद नसावेत, असे मत मुंबई येथील मराठी बाल साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजीव तांबे यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

प्रश्न: बाल साहित्य परिषदेचं उद्दिष्ठ काय? उत्तर: विविध भाषेतील बाल साहित्यांचा आणि चळवळींचा तौलनिक अभ्यास करणे आणि बालसाहत्यीकांचा एक दबागट तयार करणे, यासारखे प्रयत्न बालसाहित्य परिषदेच्या माध्यमातून करता येतील. त्यानंतर मुलं वाचनापासून कशी दूर जात आहेत, त्यांचा ओढा कशाकडे आहे, त्यांचे वाचन वाढविण्यासाठी काय करता यईल? यासारख्या अनेक प्रश्नांचा उलगडा या परिषदेत होतो. मुलांपर्यंत दर्जेदार पुस्तके पोहचविणे हे ठळक उद्दिष्ठ बाल साहित्य परिषदेच आहे.  

प्रश्न: साहित्य क्षेत्रात गटबाजी आहे का?उत्तर : गटबाजी तर प्रत्येक क्षेत्रात असते. परंतू आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि बाल साहित्य परिषद हे दोन गट एकत्र आले आहेत. अखिल भारतीय साहित्य महामंडळ व बाल साहित्य यांच्या एकत्रितपणामुळे साहित्य क्षेत्रातील एक वर्तुळ पूर्ण होत आहे. 

प्रश्न: ० ते ६ वयोगटासाठी कसे बालसाहित्य हवे? उत्तर: ० ते ६ वयोगटासाठी बालसाहित्य नाही. त्यासाठी दिल्लीतून पुस्तके आणावी लागत आहेत. शासनाच्या धोरणानुसार बालवाढीसाठी शासनाचा अधिकृत कोर्स नाही. बालवाड्या नाही, त्या अंगणवाड्या आहेत. परंतु त्या उसळवाड्या झाल्या आहेत. ० ते ६ वयोगटासाठी पुस्तके व्हायला पाहिजे. मात्र त्यामध्ये ९० टक्के चित्र आणि १० टक्के मजकूर पाहिजे. तर काही पुस्तके शब्दाशिवाय पाहिजे, असे बालसाहित्य निर्माण करणे आवश्यक आहे.

प्रश्न: शिक्षण आणि साहित्य यांचा संबंध कसा आहे?उत्तर: बालकांना शिक्षणासोबत साहित्याची ओळख महत्वाची आहे.  शिक्षणाने आयुष्याला आकार आणि अर्थ देता येईल. स्वत: च्या क्षमतांचा विकास करत जगण्याची दिशा यामुळे सापडते. परंतू सध्या शिक्षण आणि साहित्य यांचा संबंध जोडला गेला नाही. जे टागोर यांनी केले म्हणून ‘करी मनोरंजन शिक्षणातून जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे’ असे वाक्य घ्यायला पाहिजे.  

प्रश्न: मुलांमध्ये असलेली ठरावीक विषयांची भिती दूर करण्यासाठी काय करता येईल?उत्तर: गणित आणि विज्ञान याची उपजत भिती मुलांना नसते. ती भिती पालक आणि शिक्षकांकडून मुलांना दाखविली जाते, ज्याचा धसका मुले आयुष्यभर घेतात. दैनंदिन जीवनातील गणित आणि विज्ञान यांचा सहसंबंध जर आपण मुलांना उलगडूण दाखवला तर त्या भितीचे मैत्रीत रुपांतर होईल. जीवनात जोडणारी उदहरणे यामध्ये महत्वाची असतात. 

प्रश्न: मुलांना वाचनाची आवड कशी निर्माण करता येईल?उत्तर: मुलांना ज्या साहित्य प्रकारात आवड आहे, ते साहित्य त्यांच्यापर्यंत पोहचले, तर त्यांना ते वाचान करण्याची आवड निर्माण होईल. त्यासाठी मुलांना वेगवेगळे साहित्य प्रकार वाचायला मिळाले पाहिजे. विज्ञानभय कथा, परीकथा, समुद्र कथा हे साहित्य मुलांना मिळत नाही. मी स्वत: मुलांसाठी २७ साहित्य प्रकार लिहिले आहेत. लिहिण्याची हिम्मत दाखवणे अपेक्षीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत