शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

पालक आणि मुले यांच्यात मतभेद असावे, पण ‘मनभेद’ नसावे! - राजीव तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 16:44 IST

घरात पालक आणि मुले यांच्यात मतभेद जरूर असावेत, पण मनभेद नसावेत, असे मत मुंबई येथील मराठी बाल साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजीव तांबे यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: मुलांच्या वेगवेगळ्या विचारांचा आदर आपण करायला शिकले पाहिजे. मुलांपर्यंत योग्य साहित्य पोहचविले पाहिजे. मुलांना आपली आवड शोधायला वेळ लागतो. त्यासाठीचा वेध आणि संधी मुलांना उपलब्ध करून द्यावी लागते. म्हणूनच त्यांना त्यांच्या आवडीबदलण्याचं स्वातंत्र्य द्यावं लागतं. घरात पालक आणि मुले यांच्यात मतभेद जरूर असावेत, पण मनभेद नसावेत, असे मत मुंबई येथील मराठी बाल साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजीव तांबे यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

प्रश्न: बाल साहित्य परिषदेचं उद्दिष्ठ काय? उत्तर: विविध भाषेतील बाल साहित्यांचा आणि चळवळींचा तौलनिक अभ्यास करणे आणि बालसाहत्यीकांचा एक दबागट तयार करणे, यासारखे प्रयत्न बालसाहित्य परिषदेच्या माध्यमातून करता येतील. त्यानंतर मुलं वाचनापासून कशी दूर जात आहेत, त्यांचा ओढा कशाकडे आहे, त्यांचे वाचन वाढविण्यासाठी काय करता यईल? यासारख्या अनेक प्रश्नांचा उलगडा या परिषदेत होतो. मुलांपर्यंत दर्जेदार पुस्तके पोहचविणे हे ठळक उद्दिष्ठ बाल साहित्य परिषदेच आहे.  

प्रश्न: साहित्य क्षेत्रात गटबाजी आहे का?उत्तर : गटबाजी तर प्रत्येक क्षेत्रात असते. परंतू आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि बाल साहित्य परिषद हे दोन गट एकत्र आले आहेत. अखिल भारतीय साहित्य महामंडळ व बाल साहित्य यांच्या एकत्रितपणामुळे साहित्य क्षेत्रातील एक वर्तुळ पूर्ण होत आहे. 

प्रश्न: ० ते ६ वयोगटासाठी कसे बालसाहित्य हवे? उत्तर: ० ते ६ वयोगटासाठी बालसाहित्य नाही. त्यासाठी दिल्लीतून पुस्तके आणावी लागत आहेत. शासनाच्या धोरणानुसार बालवाढीसाठी शासनाचा अधिकृत कोर्स नाही. बालवाड्या नाही, त्या अंगणवाड्या आहेत. परंतु त्या उसळवाड्या झाल्या आहेत. ० ते ६ वयोगटासाठी पुस्तके व्हायला पाहिजे. मात्र त्यामध्ये ९० टक्के चित्र आणि १० टक्के मजकूर पाहिजे. तर काही पुस्तके शब्दाशिवाय पाहिजे, असे बालसाहित्य निर्माण करणे आवश्यक आहे.

प्रश्न: शिक्षण आणि साहित्य यांचा संबंध कसा आहे?उत्तर: बालकांना शिक्षणासोबत साहित्याची ओळख महत्वाची आहे.  शिक्षणाने आयुष्याला आकार आणि अर्थ देता येईल. स्वत: च्या क्षमतांचा विकास करत जगण्याची दिशा यामुळे सापडते. परंतू सध्या शिक्षण आणि साहित्य यांचा संबंध जोडला गेला नाही. जे टागोर यांनी केले म्हणून ‘करी मनोरंजन शिक्षणातून जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे’ असे वाक्य घ्यायला पाहिजे.  

प्रश्न: मुलांमध्ये असलेली ठरावीक विषयांची भिती दूर करण्यासाठी काय करता येईल?उत्तर: गणित आणि विज्ञान याची उपजत भिती मुलांना नसते. ती भिती पालक आणि शिक्षकांकडून मुलांना दाखविली जाते, ज्याचा धसका मुले आयुष्यभर घेतात. दैनंदिन जीवनातील गणित आणि विज्ञान यांचा सहसंबंध जर आपण मुलांना उलगडूण दाखवला तर त्या भितीचे मैत्रीत रुपांतर होईल. जीवनात जोडणारी उदहरणे यामध्ये महत्वाची असतात. 

प्रश्न: मुलांना वाचनाची आवड कशी निर्माण करता येईल?उत्तर: मुलांना ज्या साहित्य प्रकारात आवड आहे, ते साहित्य त्यांच्यापर्यंत पोहचले, तर त्यांना ते वाचान करण्याची आवड निर्माण होईल. त्यासाठी मुलांना वेगवेगळे साहित्य प्रकार वाचायला मिळाले पाहिजे. विज्ञानभय कथा, परीकथा, समुद्र कथा हे साहित्य मुलांना मिळत नाही. मी स्वत: मुलांसाठी २७ साहित्य प्रकार लिहिले आहेत. लिहिण्याची हिम्मत दाखवणे अपेक्षीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत