शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या व्यापारी संकुलाचे ग्रहण सुटता सुटेना!

By admin | Updated: April 26, 2017 00:59 IST

पाच वर्षांपासून रखडला लिलाव : विरोधी पक्षाचा तिढा कायम

खामगाव: नगरपालिका इमारतीनजीक आणि शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुलाचे ग्रहण सुटता-सुटत नसल्याचे चित्र दिसून आहे. गेल्या पाच वर्षांपासून तयार अवस्थेत असलेल्या या व्यापारी संकुलाच्या लिलावाची प्रक्रिया रखडली असून, निर्मितीपासूनच ‘विरोधी’ पक्षाच्या रडारवर हे व्यापारी संकुल सापडले आहे. याबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या खामगाव शहरात नगरपालिका प्रशासनाच्यावतीने केंद्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत व्यापारी संकुलाची निर्मिती करण्यात आली. खामगाव नगरपालिकेच्या अद्ययावत प्रशासकीय वास्तुला लागूनच पालिकेचे व्यापारी संकुल उभारण्यात आले. आयडीएसएमटी योजनेंतर्गत सन २०११-१२ या आर्थिक वर्षांत मंजुरी मिळालेल्या या संकुलातील २९ गाळ्यांचे बांधकाम सन २०१२-१३ मध्ये पुर्णत्वास आले. त्याचवेळी संबंधित कंत्राटदाराकडून या व्यापारी संकुलाचे पालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले; मात्र या व्यापारी संकुलाच्या लिलावाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून पालिकेच्या या व्यापारी संकुलाचा लिलाव रखडला आहे. या व्यापारी संकुलावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आलटून-पालटून राजकीय ‘खेळ’ रंगत आहे. त्यामुळे पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून, लक्षावधी रुपयांच्या कराचेही नुकसान होत असल्याची वस्तुस्थिती आहे. याकडे वरिष्ठ पातळीवरून लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कोट्यवधींचा खर्च!खामगाव नगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा एक भाग म्हणून २९ गाळे असलेल्या व्यापारी संकुलाची निर्मिती करण्यात आली; मात्र गेल्या पाच वर्षांपासून या व्यापारी सुंकलाच्या लिलावाचे ग्रहण सुटत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, या व्यापारी संकुलाच्या निर्मितीसाठी करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. विरोधासाठी राजकारण!व्यापारी संकुलाच्या निर्मितीपासूनच विरोधी पक्षाकडून या व्यापारी संकुलाला लक्ष्य केले जात आहे. पालिकेत नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर २८ फेब्रुवारी २०१७ च्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक २७ नुसार व्यापारी संकुलाचा विषय सभेसमोर ठेवण्यात आला; मात्र विरोधकांनी या विषयाला आक्षेप नोंदविला. उल्लेखनीय म्हणजे या आधी सत्तेवर असलेल्या सध्याच्या विरोधकांनीसुद्धा दोन वर्षांपर्वी व्यापारी संकुल हर्रासीचा ठराव मांडला होता. त्यावेळी आताच्या सत्ताधाऱ्यांनी त्याला विरोध दर्शविला होता. नुकसानात भर!व्यापारी संकुलातील २९ गाळ्यांचा लिलाव लालफितशाहीत रखडला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून या व्यापारी संकुलापासून मिळणाऱ्या भाड्यापोटी आणि करापोटीच्या उत्पन्नापासून पालिकेला वंचित रहावे लागत आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या भाड्याचे नुकसान झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात होत आहे.