शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

धक्कादायक! राज्य सरकारचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या; सणादिवशीच मृत्यूला कवटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 14:01 IST

Maharashtra Farmer Suicide: युवा शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत विषारी औषध पिऊन आपलं जीवन संपवलं.

Buldhana Farmer Suicide: राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त तरुणाने सुसाईड नोट लिहीत मृत्यूला कवटाळल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या तालुक्यात घडली आहे. कैलास नागरे असं या युवा शेतकऱ्याचं नाव असून माझ्या आत्महत्येस सरकार कारणीभूत असल्याचं नागरे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्यासाठी लढा देऊनही सकारात्मक प्रतिसाद न देण्यात आल्याने मी हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचा उल्लेख या नोटमध्ये आढळून आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथील शिवनी आरमाळ शिवारात कायमच पाण्याची चणचण जाणवते. ही समस्या दूर व्हावी यासाठी कैलास नागरे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन उभारले होते. यंदा ओव्हरफ्लो झालेल्या खडकपूर्णा धरणातून शिवनी आरमाळ येथील पाटबंधारे विभागाच्या लघु प्रकल्पात पाणी सोडावे, अशी नागरे यांची मागणी होती. विशेष म्हणजे आंदोलनानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी कैलास नागरे यांना पाणी सोडण्याबाबत लेखी आश्वासनही दिले होते. परंतु मार्च महिना उजाडला तरी ही मागणी मान्य न करण्यात आल्याने अखेर या युवा शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत विषारी औषध पिऊन आपलं जीवन संपवलं.

"पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा आणि..."

कैलास नागरे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय की, "आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत. परंतु तरीही पाणी येत नाही. माझ्यावर आता केळी आणि पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा व राख आनंदस्वामी धरणात टाका. मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारावं. माझ्या मुलांचे शिक्षण करण्यासाठी मी असमर्थ ठरलो... स्वतः शून्य झालो."

दरम्यान, आधुनिक पद्धतीने शेती करण्याची आवड असलेला आणि राज्य सरकारने पुरस्कार देऊन गौरन्वित केलेल्या शेतकऱ्यानेच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfarmer suicideशेतकरी आत्महत्याMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र