शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

सलग दुसऱ्या वर्षी रेणुकादेवी चैत्र यात्रोत्सव रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:32 AM

शहराचे आराध्य दैवत रेणुकादेवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवाला लाखो भाविक दरवर्षी येतात. यामुळे येथे दरवर्षी प्रसाद, मिठाई, खेळणी, कटलरी साहित्य, ...

शहराचे आराध्य दैवत रेणुकादेवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवाला लाखो भाविक दरवर्षी येतात. यामुळे येथे दरवर्षी प्रसाद, मिठाई, खेळणी, कटलरी साहित्य, भांडे आदींसह एकूण बाजारपेठ व प्रवासी वाहतूक, हॉटेल, शीतपेय व्यवसायाला मोठा लाभ होतो. लाखो रुपयांची उलाढाल या यात्रेनिमित्ताने होते. तथापि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून सर्वदूर ख्याती असल्याने नवस फेडणे, दर्शनासाठी मोठी गर्दी यानिमित्ताने शहरात होत असते. मात्र, कोरोनामुळे गतवर्षी यात्रा रद्द झाली होती. त्यापश्चातही अनेक दिवस मंदिर बंद असल्याने याचा फटका मंदिर परिसरातील दुकानदारांना बसला आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रेतून तरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, यंदाही चैत्र यात्रा व इतर सर्व सार्वजनिक उत्सव रद्द झाल्याने सर्वांचाच हिरमोड झाला आहे. यात्रा रद्द करण्याबाबत श्री रेणुका देवी संस्थान चिखली विश्वस्त मंडळ व जिल्हा प्रशासनाचा निर्णय झाला आहे. भाविकांनी कठोर निर्बंध पाळत घरीच राहण्याचे आवाहन व मंदिरात गर्दी न करण्याच्या सूचना या पृष्ठभूमीवर देण्यात आल्या आहे. 'विदर्भासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका देवीच्या वासंतिक नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने हजारो वर्षांपासून चालत आलेला आदिशक्ती श्री रेणुका देवी चैत्र पौर्णिमा उत्सव, वहनोत्सव नगर परिक्रमा आज देशापुढील कोरोना आपत्तीमुळे होणार नाही, परंपरा ही जपूच पण सार्वजनिक सोहळा करता येणार नाही, कोणालाच सहभागी होता येणार नाही', असे संस्थानच्या विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे.

सर्वच कार्यक्रम रद्द

चिखलीत चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवानिमित्त देवीचे वहन मिरवणूक व नगर परिक्रमा या यात्रेचे प्रमुख आकर्षण असते. यावर्षी २७ एप्रिलला हा सोहळा नियोजित होता. मात्र, देवीचे वहन मिरवणूक निघणार नाही. यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. २७ एप्रिल पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थिातीत देवीची आरती होईल. त्याचवेळी सर्व भाविकांनी आपापल्या घरी देवीच्या प्रतिमेसमोर पूजा, आरती करावी, याचे प्रतीक म्हणून दारासमोर अंगणात ५ दिवे लावावेत आणि प्रामुख्याने कोरोना विषाणू संकटाशी लढा देण्याची शक्ती आम्हाला दे, अशी प्रार्थना देवीकडे करावी, असे आवाहन संस्थानने केले असून देवीच्या चैत्र नवरात्राचे उपवास २७ एप्रिलला सुटतील, असे स्पष्ट केले आहे.