शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

 पावसाच्या पुनरागमनाचा पिकांना मिळाला आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 2:46 PM

बुलडाणा : जिल्ह्यात शनिवारी रात्री अनेक दिवसानंतर पावसाने हजेरी असून रात्रीतून २१.३ मि.मी पावसाची नोंद झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात शनिवारी रात्री अनेक दिवसानंतर पावसाने हजेरी असून रात्रीतून २१.३ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या या पुनरागमनामुळे पिकांना काहीसा आधार मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २४१.२ मि.मी. म्हणजे सर्वसाधारण पर्जन्यमानाच्या तुलनेत ३५.१२ टक्के पाऊस झाला आहे. विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. या पावसामुळे तापमानही खाली आले आहे.जिल्ह्यात खरीप हंगामाची ८५ टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. मृग आणि आद्रा नक्षत्राच्या जोडावर सुरू झालेल्या पावसाने खरीप पेरणीला सुरूवात करून दिली होती. हा पाऊस जवळपास जून अखेरचा आठवडा व जुलैच्या सुरूवातीला काही दिवस राहिला. यामध्ये जिल्हाभर कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी पूर्ण केली. मात्र गेल्या १५ दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने शेतकरी पिकांची परिस्थीती गंभीर होती. मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांनी शेत अगदी हिरवेगार दिसून येत होती. परंतू पावसाअभावी दुपारच्या वेळी ही पिके सुकलेली दिसायची. अनेक ठिकाणी वरूण राजासाठी शेतकरी साकडे घालत असल्याचे चित्र पहायला मिळाले.पावसाची नितांत आवश्यकता असताना शनिवारी रात्री ८ वाजेदरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचे पुनरागमन झाले. जिल्ह्यात आतापर्यंत २४१.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी रात्री दरम्यान झालेल्या या पावसाने अनेक ठिकाणचे पिके वाचली. या पावसाने आणखी काही दिवसांसाठी पिकांचा धोका टळला. पावसाच्या या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, पिकांसाठी हा पाऊस संजीवनी ठरला आहे. पुढील आठवड्यातही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरी