शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

गाईपालनातून साधली अल्पभूधारक शेतकऱ्याने प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:52 IST

किनगाव जट्टू येथून जवळच असलेल्या भुमराळा येथील शेतकरी लक्ष्मण टेकाळे हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांच्याकडे फक्त साडेतीन एकर जमीन ...

किनगाव जट्टू येथून जवळच असलेल्या भुमराळा येथील शेतकरी लक्ष्मण टेकाळे हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांच्याकडे फक्त साडेतीन एकर जमीन आहे. पूर्णा नदीतून पाणी घेऊन शेती व्यवसाय करतात; परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती तोट्याची झाली आहे. शेती व येणाऱ्या मालाला कमी भाव, असे संकट एकामागोमाग एक सुरू आहे. त्यामुळे शेतीला लागलेला खर्च वसूल होत नाही. त्यांनी भाजीपाला लावणी करून विक्री सुरू केली होती. दरम्यान, कोरोना संसर्ग आजारामुळे बाजार बंद होते, त्यामुळे भाजीपालासुद्धा कमी भावात विकावा लागला. शेतीला जोडव्यवसाय म्हणून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्याकरिता दोन गीर जातीच्या गाई विकत आणून त्यांच्या दुधापासून दही, तूप, पनीर, इतर पदार्थांचा विक्री व्यवसाय सुरू केला. त्यांना कोरोनाच्या काळात शेतीला जोडधंद्यातून प्रगतीचा मार्ग सापडला आहे. गाईच्या शेणापासून व गोमूत्रापासून सेंद्रिय खत तयार होत असल्याने शेतातील मालाला उपयोगी पडत असून, विषमुक्त पिकाचे उत्पादन तयार होत असल्याचे टेकाळे यांनी सांगितले.